शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

५४ पैकी ४२ आरोग्य केंद्रे धोक्याची; अग्निसुरक्षेबाबत गाफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST

बीड : जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रातही रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ५४ पैकी केवळ ...

बीड : जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रातही रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ५४ पैकी केवळ १२ केंद्रांचे ऑडिट झाले असून, इतर ४२ केंद्रांत धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक म्हणजे एकाही आरोग्य केंद्राकडे अग्निशमन विभागाची एनओसी नसल्याचे उघड झाले आहे.

भंडारा येथील शिशू गृहातील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच आरोग्य संस्थांचे ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या. त्याच अनुषंगाने शहरी व ग्रामीण आरोग्य संस्थांचा आढावा घेतला असता केवळ बोटावर मोजण्याइतक्याच संस्थांनी फायर ऑडिट केल्याचे समाेर आले. ऑडिट तर दुरच परंतु त्यांच्याकडे अग्निशमन विभागाची एनओसीही नसल्याचे समोर आले आहे. यावरून आरोग्य विभाग रुग्ण व त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाइकांच्या सुरेक्षेबाबत गाफील होता, हे उघड झाले आहे. आतातरी या उपाययोजना करून सर्व सुरक्षा करण्याची गरज आहे.

या केंद्रांनी केले ऑडिट

जिल्ह्यातील १२ आरोग्य केंद्रांनी ऑडिट केले आहे. यात आडस, बनसारोळा, चिंचोलीमाळी, राजेगाव, वीडा, युसूफवडगाव, भोगलवाडी, मोहखेड, अंमळनेर, डोंगरकिन्ही, नायगाव, वाहली यांचा समावेश येतो. यांनी ऑडिट केले असले तरी त्यांच्याकडे एनओसी नाही, हे देखील खरे आहे.

लागेल आग, तेव्हा येईल जाग

मागील पाच वर्षांत एकाही आरोग्य केंद्रात आगीची घटना सुदैवाने घडलेली नाही. असे असले तरी घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाला नेहमी आग लागल्यावरच जाग येते. त्यामुळे आताच याची काळजी घेणे गरजेचे आहे.

१८ केंद्रांत अग्निरोधक यंत्रांचा अभाव

आरोग्य केंद्रात आगीची घटना घडली तरी प्राथमिक उपाय म्हणून अग्निरोधक यंत्रही नसल्याचे समोर आले आहे. यात कडा, शिरूर, खालापुरी, टाकळसिंग, निपाणीजवळका, सीडी अंबाजोगाई, खडकपुरा, सादोळा, गंगामसला, पात्रूड, किट्टीआडगाव, टाकरवण, धर्मापुरी, मोहा, नागापूर, सिरसाळा, पोहनेर, नाथ्रा या १८ आरोग्य केंद्रात हे यंत्र नाही.

कोट -

भंडारा दुर्घटनेनंतर सर्वच माहिती मागविली आहे. अनेक संस्थांत ऑडिट झाले नाही, हे खरे आहे. ते तत्काळ करून घेतले जात आहे. तसेच रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच उपाययोजना केल्या जातील. त्या दृष्टीने नियोजन केले जात असून, लवकरच पूर्ण होईल.

डॉ. आर. बी. पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.