शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

एस.टी.च्या ३७६ बसेसनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST

बीड : जिल्ह्यात राज्य परीवहन महामंडळाची बस प्रवासासाठी सुरक्षित समजली जाते. परंतु मागील वर्षभरात ३७६ बसेसने प्रवाशांची साथ अर्ध्या ...

बीड : जिल्ह्यात राज्य परीवहन महामंडळाची बस प्रवासासाठी सुरक्षित समजली जाते. परंतु मागील वर्षभरात ३७६ बसेसने प्रवाशांची साथ अर्ध्या रस्त्यात सोडली आहे. स्प्रींग तुटणे, टायर पंक्चर, अपघात अशा विविध कारणांमुळे या बस खराब थांबल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे आठ आगार आहेत. याअंतर्गत ५३२ बसेस आहेत. प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी या बसेस २४ तास धावत असतात. चालक, वाहकही प्रामाणिक कर्तव्य बजावता. वाहतूक निरीक्षक, आगारप्रमुख यांच्याकडे बसेस वेळेवर सोडण्यासाठी नियोजन केले जाते. परंतु काही बसेस रस्त्यातच स्प्रींग तुटणे, टायर पंक्चर, अपघात, स्टार्टमध्ये बिघाड, एअर लॉक होणे, इंजिन बंद पडणे अशा वेगवेगळ्या कारणांनी बंद पडतात. किरकोळ बिघाड असेल तर चालक, वाहकच दुरूस्त करतात. परंतु माेठी बिघाड असल्यास तात्काळ ब्रेकडाऊन व्हॅनला संपर्क केला जातो. अवघ्या काही तासांत ही बस बिघाड झालेल्या बसच्या ठिकाणी पोहचले. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून मार्गस्थ केल जाते. प्रवाशांना ताटकळत अथवा त्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी रापमकडून प्रयत्न केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

४३ खराब बसेस भंगारात

ज्या बसेसचे वय १० वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा १० लाख किमी अंतर कपात केले आहे, अशा बसेस भंगारात विकल्या जातात. यावर्षी ४३ बसेस भंगारात विक्री केल्या आहेत. ही सर्व कारवाई विभागीय यंत्र अभियंता यांच्यामार्फत करण्यात येते.

मेंटनन्ससाठी लाखोंचा खर्च

बिघाड झालेल्या बसेस दुरूस्त करणे, त्यांचे नियमित मेंटनन्स करणे यासाठी रापमकडून वर्षाकाठी लाखोंचा खर्च केला जातो. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाते. बस आगाराच्या बाहेर पडण्यापूर्वी एका तंत्रज्ञाकडून बसची तपासणी केली जाते. तसेच बस चालकानेहीही बस तपासून घेणे बंधनकारक असते.

लॉकडाऊनमुळे संख्या कमी

२०२० या वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे सर्व बसेस जागेवरच होत्या. त्यामुळे रस्त्यात बिघड होणाऱ्या बसेसचा आकडा कमी आहे.वर्षभर बसेस धावत राहिल्यास हा आकडा ५०० पेक्षा जास्त होतो, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोट

स्प्रींग तुटणे, टायर पंक्चर, अपघात, स्टार्टमध्ये बिघाड, एअर लॉक होणे, इंजिन बंद पडणे अशा विविध कारणांमुळे बसेस अचानक रस्त्यात बंद पडतात. त्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्ह्यात पाच ब्रेकडाऊन व्हॅन आहेत. प्रवाशांचे हाल होणार नाहीत, यासाठी दुसरी बस तात्काळ उपलब्ध केली जाते.

कालिदास लांडगे

विभागीय यंत्र अभियंता, बीड

---

जिल्ह्यातील एकूण बसेस - ५३२