शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

३४० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाने ग्रामीण भागात जास्त पाय पसरले होते. असे असले तरी सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ...

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाने ग्रामीण भागात जास्त पाय पसरले होते. असे असले तरी सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३४० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर हाकलून गाव कोरोनामुक्त ठेवले आहे. सध्या ग्रामीण भागात ३ हजार ३८५ ॲक्टिव्ह रुग्ण असून, पॉझिटिव्हिटी रेट हा १०.९ टक्के एवढा आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला हद्दपार करण्यात यश येत आहे.

जिल्ह्यात एक हजार ३१ ग्रामपंचायती असून, त्याअंतर्गत १ हजार ४०२ गावे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भाग सुरक्षित होता; परंतु दुसऱ्या लाटेत शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना केल्या. मिशन झीरो डेथ, सर्वेक्षण, कोमार्बीड रुग्ण शोधणे, अँटिजन कॅम्प घेणे, आरटीपीसीआर स्वॅब घेऊन चाचण्यांची संख्या वाढवीत रुग्णसंख्या शोधली. त्यामुळे वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आता ब्रेक लागत आहे. आतापर्यंत ३८ हजार रुग्ण ग्रामीण भागात निष्पन्न झाले असून, पैकी सद्य:स्थितीत ३ हजार ३८५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. ८७१ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी योग्य उपाययोजना आणि नियोजनामुळे आरोग्य विभागाला ग्रामीणमधील रुग्णसंख्या रोखण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडीसेविका, इतर कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

....

मुख्य सचिवांकडून कुंभार व टीमचे कौतुक

ग्रामीण भागातील आढावा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शनिवारी घेतला. यात बीडचा अहवाल सीईओ अजित कुंभार यांनी सादर केला. मिशन झीरो डेथ, पॉझिटिव्ह रुग्ण शोधणाऱ्या आशांना १०० रुपये बक्षीस, सर्वेक्षण, चाचण्या वाढविणे, गावांमध्ये समिती नियुक्त करणे, आदी उपाययोजना केल्याचे सांगितले, तसेच लसीकरणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गर्दी कशी टाळली आणि त्याचा कशा प्रकारे फायदा होतो, हे कुंभार यांनी मांडले. ही बाब सचिव कुंटे यांना भावली आणि त्यांनी कुंभार यांच्यासह सर्व टीमचे तोंडभरून कौतुक केले.

....

मुख्य सचिवांसमोर सर्व बाबी मांडल्या. आतापर्यंतची ग्रामीण भागातील स्थिती आणि केलेल्या उपाययोजना, तंत्रज्ञानाचा वापर याची सर्व माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून, याला यश येत असल्याचे दिसते. ग्रामीण आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत आहे.

-अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड

.....

ग्रामीण भागात सुरुवातीपासूनच यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. थोड्याफार चुका होत्या, त्यात सुधारणा केली. शहरापेक्षा आजही ग्रामीणची स्थिती चांगली आहे. तरीही आम्ही गाफील राहत नसून, नवनवीन उपाययोजना करून गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. माझी सर्व टीम दिवसरात्र मेहनत घेत आहे.

-डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

-----

...अशी आहे ग्रामीण भागाची आकडेवारी

एकूणे गावे १,४०२

एकूण ग्रामपंचायती १,०३१

एकूण लोकसंख्या २४,२१,६५०

आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३८,३८६

सद्य:स्थितीत एकूण ॲक्टिव्ह रुग्ण ३३८५

आतापर्यंत एकूण कोरोनाबळी ८७१

सद्य:स्थितीत कोरोनामुक्त ग्रामपंचायती २६७

सद्य:स्थितीत कोरोनामुक्त गावे ३४०

सद्य:स्थितीत पॉझिटिव्हिटी रेट १०.९

एकूण आयसोलेशन बेड ३,०४०

सीसीसीमधील बेड १,९७५

एकूण ऑक्सिजन बेड ६५५

एकूण आयसीयू बेड १६०