शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

बीड जिल्ह्यात ३०९ मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST

बीड : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ मार्च ते १० मार्चदरम्यान शाळेच्या प्रवाहात ...

बीड : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ मार्च ते १० मार्चदरम्यान शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली होती. कोरोनाच्या स्थितीमुळे अडथळे पार करत सर्वेक्षण करण्यात आले. याचा एकूण अंतिम अहवाल काही दिवसातच प्राप्त होणार असला तरी लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ३०९ मुले शाळाबाह्य आढळून आले आहेत. धारूर तालुक्यात सर्वाधिक ११४ मुले आढळल्याची माहिती आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क, अधिकार अधिनियम २००९ राज्यात १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ३ ते १८ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. बीड येथे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन कृती कार्यक्रम आखून या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्र शाळेच्या स्तरावर बैठक घेऊन शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात गाव स्तरावर त्यांनी सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची तसेच ग्रामसेवकांची मदत घेण्यात आली.

५५ टक्के मुली

या शोधमोहिमेत ३०९ मुलांपैकी १६५ मुली तर १४० मुले शाळाबाह्य आढळली आहेत. तर एकूण मुलांमध्ये विशेष गरजाधिष्ठित मुले २२, बालकामगार ४ आणि अन्य विविध कारणांमुळे २८३ मुलांना शाळाबाह्य राहावे लागले आहे. कौटुंबिक गरजांमुळे कचरा वेचणे, मजुरी करणे, भंगार गोळा करणे, आज इथे तर उद्या तिथे याप्रमाणे मजुरीसाठी भटकंती करणाऱ्या कुटुंबातील ही २८३ मुले आहेत. मूलभूत सुविधांअभावी या मुलांना शाळाबाह्य राहावे लागल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे.

७००० कर्मचारी मोहिमेत

शाळाबाह्य मुलांसाठीच्या या शोधमोहिमेत बालरक्षक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, डायटचे अधिव्याख्याता, प्राचार्य आदी घटकांना सामील केले होते. विविध विभागातील ७ हजार कर्मचाऱ्यांकडून शाळाबाह्य मुले शोधण्याचे काम करण्यात आले.

तालुकानिहाय शाळाबाह्य मुले

अंबाजोगाई ३, आष्टी ७, बीड ३८, धारूर ११४, गेवराई २७, केज २०, माजलगाव २५, परळी ०, पाटोदा २०, शिरूर १६, वडवणी ३९ - एकूण ३०९

----

जिल्ह्यात १ ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. सर्वच विभागांनी सहकार्य केले. यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी वाडी, वस्ती, तांड्यावर जात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. अहवाल आल्यानंतर संबंधित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यात येईल.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग)

------------

परळीत शून्य तर धारूरमध्ये सर्वाधिक

शाळबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत अनेक ठिकाणी काेरोनाचा अडसर होता. तरीही सर्व दक्षता बाळगत शिक्षकांसह इतर विभागांनी काम केले. या मोहिमेत धारूर तालुक्यात ११४ शाळाबाह्य मुले आढळली आहेत. तुलनेने इतर तालुक्यात ही संख्या प्रत्येकी ४० च्या आत आहे. परंतु अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी तालुक्यात ७ व परळी तालुक्यात शून्य मुले शाळाबाह्य आढळणे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. खरोखरच शाळाबाह्य मुले इतकी आहेत की सर्वेक्षणाचे सोपस्कार पार पाडले गेले, हा तपासणीचा विषय आहे.

---------