शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बीड जिल्ह्यात अडीच महिन्यांत ३० शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:43 IST

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देआत्महत्या रोखण्यात शासन-प्रशासनाला अपयश

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा, लोकसभेत बीड जिल्ह्यातील आत्महत्यांचा विषय गाजला होता. त्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त जिल्हा बीडची घोषणा करण्यात आली. तसेच आत्महत्या रोखण्यासठी स्थानिक पातळीवर विविध योजना राबवल्या गेल्या. जनजागृती अभियान राबवले गेले. परंतु याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. शासन, नाम फाऊंडेशन व इतर संस्थांकडून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देखील केली गेली.

शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणी मात्र अजून केली गेली नाही. त्यामध्येच नगदी पीक असलेल्या कापसावर बोंडअळीने हल्ला केला. त्यामुळे उत्पादनात घट झाली. तसेच कापसाला भावही चांगला न मिळाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला. कापसाला योग्य भाव नसल्यामुळे आज देखील जिल्ह्यात ६० टक्क्यांवर कापूस शेतकºयांडेच आहे. अनेक ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रांवर तूर उत्पादक शेतकºयांची अडवणूक करण्यात आली. तसेच शेतात काम करणाºयांची मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.कर्जमाफीच्या अंमलबजावणीची मागणीशासनाने कर्जमाफीची घोषणा केली त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी, बोंडअळीमुळे झालेली नुकसानभरपाई सरसकट द्यावी, तूर, कापसाला हमी भाव द्या, अशी मागणी शेतकरी नितीन खंडागळे, अशोक खंडागळे यांनी केली आहे.