शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मादळमोहीमध्ये पाण्यातून २६ शेळ्यांना विषबाधा; १२ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:42 IST

पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.मादळमोही भागवत सीताराम गावडे यांच्याकडे २६ शेळ्या आहेत. मंगळवारी त्यांनी या शेळ्या चारण्यासाठी शेतात नेल्या होत्या. दरम्यान सायंकाळी ४ वा. शेतातून शेळ्या परत आणून गावडे यांच्या गावालगत असलेल्या वाड्यात बांधल्या. मात्र यानंतर अचानक शेळ्यांना चकरा येण्यास सुरूवात झाली. यावेळी गावडे यांनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉ.मोहोळकर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ शेळ्यांवर उपचार सुरू केले. मात्र काही ठराविक वेळाने यामधील १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. अजूनही काही शेळ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान यामध्ये भागवत गावडे यांचे जवळपास १ लाख २० हजारांचे नुकसान झाले असून, तलाठ्यांनी पंचनामा करुन वरिष्ठांकडे तसा अहवाल पाठवला आहे. दिवाळीच्या पूर्वसंधेला घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने सदरील शेतकºयास मदत करण्याची मागणी होत आहे.पाण्यातून विषबाधा ?गावडे यांनी दिवसभर शेळ्या शेतशिवारात चारल्या. या शेळ्यांनी शेतात एका ठिकाणी साठवलेले पाणी पिलेले असल्याने यामधूनच ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचे पीएम करण्यात आले असून, तो आल्यानंतरच शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे कारण स्पष्ट होईल.मदतीला धावली रासपाया घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ मादळमोही येथे जाऊन शेतकºयाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी गावडे यांना धीर देत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ३० हजार रुपये मदतीची घोषणा केली. तसेच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या माध्यमातून मेशपाल योजनेतून १ लाख निधी मंजूर करु न देण्याचे देखील आश्वासन यावेळी परमेश्वर वाघमोडे यांनी दिले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater pollutionजल प्रदूषण