शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

मादळमोहीमध्ये पाण्यातून २६ शेळ्यांना विषबाधा; १२ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:42 IST

पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही १४ शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.मादळमोही भागवत सीताराम गावडे यांच्याकडे २६ शेळ्या आहेत. मंगळवारी त्यांनी या शेळ्या चारण्यासाठी शेतात नेल्या होत्या. दरम्यान सायंकाळी ४ वा. शेतातून शेळ्या परत आणून गावडे यांच्या गावालगत असलेल्या वाड्यात बांधल्या. मात्र यानंतर अचानक शेळ्यांना चकरा येण्यास सुरूवात झाली. यावेळी गावडे यांनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉ.मोहोळकर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ शेळ्यांवर उपचार सुरू केले. मात्र काही ठराविक वेळाने यामधील १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. अजूनही काही शेळ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान यामध्ये भागवत गावडे यांचे जवळपास १ लाख २० हजारांचे नुकसान झाले असून, तलाठ्यांनी पंचनामा करुन वरिष्ठांकडे तसा अहवाल पाठवला आहे. दिवाळीच्या पूर्वसंधेला घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने सदरील शेतकºयास मदत करण्याची मागणी होत आहे.पाण्यातून विषबाधा ?गावडे यांनी दिवसभर शेळ्या शेतशिवारात चारल्या. या शेळ्यांनी शेतात एका ठिकाणी साठवलेले पाणी पिलेले असल्याने यामधूनच ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचे पीएम करण्यात आले असून, तो आल्यानंतरच शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे कारण स्पष्ट होईल.मदतीला धावली रासपाया घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ मादळमोही येथे जाऊन शेतकºयाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी गावडे यांना धीर देत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ३० हजार रुपये मदतीची घोषणा केली. तसेच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या माध्यमातून मेशपाल योजनेतून १ लाख निधी मंजूर करु न देण्याचे देखील आश्वासन यावेळी परमेश्वर वाघमोडे यांनी दिले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater pollutionजल प्रदूषण