शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा २१२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कठोर उपाय करीत असले, तरी काही तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ...

बीड : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कठोर उपाय करीत असले, तरी काही तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने कोरोनाचे मीटर वाढतच आहे. गुरुवारी कोरोनाचे २१२ नवे रुग्ण आढळून आले; तर १५३ जणांनी कोरोनावर मात केली. २४ तासांतील ३ व जुने ४ अशा एकूण सात मृत्यूची नोंद गुरुवारी आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दीडशे ते दोनशे या आकडेवारीवर मागील काही दिवसांपासून स्थिर होती; परंतु आठवडाभरापासून रुग्णवाढ दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने रोजचा दोनशेचा आकडाही पार केला आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५ हजार २४१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ५ हजार २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर, २१२ जण बाधित आढळून आले. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी तालुक्यात ७१, बीड तालुक्यात ३४, धारुरमध्ये ६, गेवराईत १०, केजमध्ये १२, माजलगावात ७, परळीत २, पाटोद्यात १७, शिरुरमध्ये ३७, तर वडवणीत १३ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी तीनजणांचा मृत्यू झाला. यामध्ये बीड शहरातील ६० वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील येवता येथील ६५ वर्षीय पुरुष आणि हनुमाननगर, बीड येथील एका पुरुषाचा समावेश आहे, तर ४ जुने मृत्यूही पोर्टलवर गुरुवारी अपडेट झाले.

जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा ९६ हजार ९२४ इतका झाला असून, ९२ हजार ७२० जणांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे. २ हजार ६०३ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या जिल्ह्यात १६०१ रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

--------

वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

जिल्ह्यात कोरेानाची दुसरी लाट अद्यापही पुरेशा प्रमाणात ओसरली नाही. मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याची दखल घेतली आहे. गेवराई, आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. मात्र लोक कोरोना संपल्याच्या अविर्भावात वागत असल्याने वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब बनत आहे.

--------------

नियमांना फाटा, प्रवस बिनधास्त

आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराई तालुक्यांम‌ध्ये सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंतची आस्थापना सुरू ठेवण्याची वेळ लक्षात घेता, दुपारी १ नंतर केवळ अत्यावश्यक कारणांशिवाय हालचाल व शहरांतर्गत अथवा गावांतर्गत प्रवासाला परवानगी राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. तरीही या तालुक्यांमध्ये नियमांचा भंग करीत प्रवास केला जात असून, प्रशासनाला कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.

-------------