शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

लग्नाला २०० लोकांची परवानगी, पण चार महिने मुहूर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये ...

बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये होणारे विवाह सोहळे आता यापुढे २०० लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. मात्र शुध्द मुहूर्त आणि लग्नसराई होऊन गेल्यानंतर शासनाने परवानगी दिल्याने त्याचा काय उपयोग? अशा प्रतिक्रिया मंगल कार्यालय चालक, मालक तसेच बँड पथकांच्या प्रमुखांनी व्यक्त केल्या.

कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून मंगल कार्यालये बंद आहेत. तर विवाहासाठी उपस्थितीची मर्यादा घातल्याने अनेकांनी साधेपणाने लग्न उरकून घेतले. तर काही ठिकाणी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठी गर्दी जमवून विवाह आयोजनाबद्दल वधू-वर पक्षाकडील मंडळींसह हॉटेल, मंगल कार्यालय चालकांवर कारवाया झाल्या. आता २०० लोकांना उपस्थितीसाठी परवानगी दिली तरी तारखा नसल्याने मंगल कार्यालय, बँड, आचारी, केटर्सकडे बुकिंगच नसल्याची स्थिती आहे. कारण चातुर्मासात विवाह करण्याचे अनेक जण टाळतात.

लग्नसमारंभासाठी या आहेत अटी

लॉन : खुले प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्वांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार.

या संलग्न संस्थांमधील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्रासह कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे (दोन्ही डोस) प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

----------

आता चार महिने तारखाच नाहीत, त्यामुळे शासनाने दिलेल्या परवानगीचा काय उपयोग? मोठे मुहूर्त होऊन गेले. मागील १८ महिन्यांतील नुकसान कधीही भरून येण्यासारखे नाही. तिसरी लाट आली तर पुन्हा संकट आहेच. सध्या बुकिंग नाही. कार्तिक पौर्णिमेनंतरच काय ते कळेल.

- संतोष सोहनी, मंगल कार्यालय मालक, बीड

----------------

शासनाने परवानगी दिली असली तरी श्रावणमास सुरू आहे. चातुर्मासात लोकांची मानसिकता नाही. तिसरी लाट आल्यास बुकिंगचे पैसे परत मिळतील का? त्यावेळी किती लोकांसाठी परवानगी असेल का? अशी चौकशी लोक करतात, त्यामुळे विवाहाच्या बुकिंग झालेल्या नाहीत.

- रवींद्र शिवणीकर, मंगल कार्यालय चालक, बीड

---------

कोरोनामुळे मागील सतरा महिन्यांपासून बँडवर निर्बंध असल्याने कलाकारांची मोठी उपासमार झाली. अजूनही या आर्थिक संकटातून कोणी सावरलेले नाही. आता शासनाने परवानगी दिली असली तरी तारखाच नसल्याने बँडसाठी ऑर्डर कोठून मिळणार?

- अरुण दोडके, बँड पथक प्रमुख, बीड

-------------

कोरोनामुळे बँड कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. दीड वर्ष कसे काढले आम्हालाच माहीत. लग्नसराईचा मोसम होऊन गेल्यावर सरकारने परवानगी दिल्याने आनंद वाटण्यासारखे काही नाही. कारण ऑर्डर नाहीत. दिवाळीनंतरच कळेल.

- देवीदास दोडके, बँड पथक प्रमुख, बीड

------------

लग्नाच्या तारखा

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये शुद्ध मुहूर्त नाहीत. मात्र १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ ऑगस्ट व १, ८, १६, १७ सप्टेंबर या गौण मुहूर्ताच्या तारखा आहेत.

----

आषाढापासून चातुर्मासाचा कालावधी विवाहासाठी निषिध्द मानलेला आहे. चातुर्मासात होणाऱ्या विवाहांना शास्त्राधार नाही. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाहाचे शुद्ध मुहूर्त नाहीत. अत्यंत अडचण असणारेच विवाह करतात, ते प्रमाण तुरळक असून साध्या पध्दतीने उरकले जातात.

- राहुल जोशी, पुरोहित, बीड

--------