शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लग्नाला २०० लोकांची परवानगी, पण चार महिने मुहूर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये ...

बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये होणारे विवाह सोहळे आता यापुढे २०० लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. मात्र शुध्द मुहूर्त आणि लग्नसराई होऊन गेल्यानंतर शासनाने परवानगी दिल्याने त्याचा काय उपयोग? अशा प्रतिक्रिया मंगल कार्यालय चालक, मालक तसेच बँड पथकांच्या प्रमुखांनी व्यक्त केल्या.

कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून मंगल कार्यालये बंद आहेत. तर विवाहासाठी उपस्थितीची मर्यादा घातल्याने अनेकांनी साधेपणाने लग्न उरकून घेतले. तर काही ठिकाणी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठी गर्दी जमवून विवाह आयोजनाबद्दल वधू-वर पक्षाकडील मंडळींसह हॉटेल, मंगल कार्यालय चालकांवर कारवाया झाल्या. आता २०० लोकांना उपस्थितीसाठी परवानगी दिली तरी तारखा नसल्याने मंगल कार्यालय, बँड, आचारी, केटर्सकडे बुकिंगच नसल्याची स्थिती आहे. कारण चातुर्मासात विवाह करण्याचे अनेक जण टाळतात.

लग्नसमारंभासाठी या आहेत अटी

लॉन : खुले प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्वांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार.

या संलग्न संस्थांमधील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्रासह कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे (दोन्ही डोस) प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

----------

आता चार महिने तारखाच नाहीत, त्यामुळे शासनाने दिलेल्या परवानगीचा काय उपयोग? मोठे मुहूर्त होऊन गेले. मागील १८ महिन्यांतील नुकसान कधीही भरून येण्यासारखे नाही. तिसरी लाट आली तर पुन्हा संकट आहेच. सध्या बुकिंग नाही. कार्तिक पौर्णिमेनंतरच काय ते कळेल.

- संतोष सोहनी, मंगल कार्यालय मालक, बीड

----------------

शासनाने परवानगी दिली असली तरी श्रावणमास सुरू आहे. चातुर्मासात लोकांची मानसिकता नाही. तिसरी लाट आल्यास बुकिंगचे पैसे परत मिळतील का? त्यावेळी किती लोकांसाठी परवानगी असेल का? अशी चौकशी लोक करतात, त्यामुळे विवाहाच्या बुकिंग झालेल्या नाहीत.

- रवींद्र शिवणीकर, मंगल कार्यालय चालक, बीड

---------

कोरोनामुळे मागील सतरा महिन्यांपासून बँडवर निर्बंध असल्याने कलाकारांची मोठी उपासमार झाली. अजूनही या आर्थिक संकटातून कोणी सावरलेले नाही. आता शासनाने परवानगी दिली असली तरी तारखाच नसल्याने बँडसाठी ऑर्डर कोठून मिळणार?

- अरुण दोडके, बँड पथक प्रमुख, बीड

-------------

कोरोनामुळे बँड कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. दीड वर्ष कसे काढले आम्हालाच माहीत. लग्नसराईचा मोसम होऊन गेल्यावर सरकारने परवानगी दिल्याने आनंद वाटण्यासारखे काही नाही. कारण ऑर्डर नाहीत. दिवाळीनंतरच कळेल.

- देवीदास दोडके, बँड पथक प्रमुख, बीड

------------

लग्नाच्या तारखा

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये शुद्ध मुहूर्त नाहीत. मात्र १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ ऑगस्ट व १, ८, १६, १७ सप्टेंबर या गौण मुहूर्ताच्या तारखा आहेत.

----

आषाढापासून चातुर्मासाचा कालावधी विवाहासाठी निषिध्द मानलेला आहे. चातुर्मासात होणाऱ्या विवाहांना शास्त्राधार नाही. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाहाचे शुद्ध मुहूर्त नाहीत. अत्यंत अडचण असणारेच विवाह करतात, ते प्रमाण तुरळक असून साध्या पध्दतीने उरकले जातात.

- राहुल जोशी, पुरोहित, बीड

--------