शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

२० वर्षांचे आंब्याचे झाड जाणीवपूर्वक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST

गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी गट शिवारात शेतातील वीस वर्षांपूर्वीचे जुने, बहरलेले, मोठे आंब्याचे झाड शेजारच्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक पेटवून देऊन ...

गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी गट शिवारात शेतातील वीस वर्षांपूर्वीचे जुने, बहरलेले, मोठे आंब्याचे झाड शेजारच्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक पेटवून देऊन जाळले. त्यामुळे हतबल झालेल्या राजामती रखमाजी हंडाळ नामक शेतकरी महिलेने गेवराई पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत संबंधित शेतकऱ्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

तालुक्यातील तळणेवाडी येथील गटनंबर ३८८ मध्ये वीस वर्षे जुने असलेले आणि बहरलेले मोठे आंब्याचे झाड आहे. याच शेताच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याने उसाचे पाचट जाळण्याचा बहाणा करून आपल्या शेतातील हे आंब्याचे झाड जाणीवपूर्वक जाळले असल्याची तक्रार राजामती हंडाळ यांनी २७ डिसेंबर रोजी गेवराई ठाण्यात केली आहे. फळ देणारे आंब्याचे झाड जाळणाऱ्या संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी हंडाळ यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत आज, सोमवारी घटनास्थळी जाऊन गेवराई पोलीस पंचनामा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. जाणीवपूर्वक फळझाड जाळल्याने संतप्त झालेल्या राजामती हंडाळ यांनी आपण याबाबत वनविभागाकडेही तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.