शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

१५ लाख लिटर पाणी रस्त्यावर !

By admin | Updated: May 14, 2014 00:27 IST

सोमनाथ खताळ , बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोमनाथ खताळ , बीड पाणीटंचाईमुळे बीडकरांना आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असतानाच बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून यातून सतत पाणी वाहत असले तरी याचे गांभीर्य मात्र संबंधितांना नसल्याचेच दिसत आहे. गेली अनेक महिन्यांपासून पाण्याचा हा अपव्यय सुरूच आहे. बीड शहराला सध्या तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेली वर्षभरापासून बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पिण्यासाठी अगदी दररोज विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. वर्षभरात ही परिस्थिती बदलली नाही. आजही शहरातील अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागत आहे. येथील प्रकल्पात हिरवे पाणी असल्याचे ‘लोकमत’ने पालिकेला दाखवून दिले होते. याची नगर परिषदेने दखल घेत मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ आणि दुधाळ यांना सोबत घेऊन या धरणाची पाहणी केली होती व प्रत्येक आठ तासाला २५ किलो तुरटी पाण्यात टाकण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता बीडकरांना शुद्ध पाणी पुरवठा होत आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून बिंदुसरा धरणाच्या भिंतीला भलेमोठे भगदाड पडले असून यामधून दररोज १५ ते २० लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच या धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात मोठ मोठी झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळ्या भिंतीत गेल्याने यातून पाण्याचा पाझर होत आहे. मागील अनेक वर्षापासून या धरणाच्या भिंतीची दुरूस्ती केली नसल्याचे तेथील एका कर्मचार्‍याने सांगितले. हजारो लोकांची भागू शकते तहान बिंदुसरा धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून दररोज १५ ते २० लाख लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. या वाया जाणार्‍या पाण्यावर शहरातील हजारो नागरिकांची तहान भागू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. म्हणे ! दोन महिन्यांपूर्वी केली पाहणी बिंदुसरा धरणाला पडलेल्या भगदाडाची दोन महिन्यापूर्वी नाशिक येथील पथकाने पाहणी केली असून या भिंतीची लवकरच दुरूस्ती करण्यात येईल, असे शाखा अभियंता डी.एम.कोकणे यांनी सांगितले. दोन महिन्यापासून अद्यापही या भिंतीची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भिंतीच्या दुरूस्तीला कधी मुहूर्त लागणार? पावसाळ्यात की धरणातील पाणी संपल्यावर? असा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत मुख्याधिकारी निलावाड म्हणाले, आम्ही याबाबत संबंधित विभागाला पत्र पाठविलेले आहे.