शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख लिटर पाणी रस्त्यावर !

By admin | Updated: May 14, 2014 00:27 IST

सोमनाथ खताळ , बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोमनाथ खताळ , बीड पाणीटंचाईमुळे बीडकरांना आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असतानाच बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून यातून सतत पाणी वाहत असले तरी याचे गांभीर्य मात्र संबंधितांना नसल्याचेच दिसत आहे. गेली अनेक महिन्यांपासून पाण्याचा हा अपव्यय सुरूच आहे. बीड शहराला सध्या तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेली वर्षभरापासून बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पिण्यासाठी अगदी दररोज विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. वर्षभरात ही परिस्थिती बदलली नाही. आजही शहरातील अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागत आहे. येथील प्रकल्पात हिरवे पाणी असल्याचे ‘लोकमत’ने पालिकेला दाखवून दिले होते. याची नगर परिषदेने दखल घेत मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ आणि दुधाळ यांना सोबत घेऊन या धरणाची पाहणी केली होती व प्रत्येक आठ तासाला २५ किलो तुरटी पाण्यात टाकण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता बीडकरांना शुद्ध पाणी पुरवठा होत आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून बिंदुसरा धरणाच्या भिंतीला भलेमोठे भगदाड पडले असून यामधून दररोज १५ ते २० लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच या धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात मोठ मोठी झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळ्या भिंतीत गेल्याने यातून पाण्याचा पाझर होत आहे. मागील अनेक वर्षापासून या धरणाच्या भिंतीची दुरूस्ती केली नसल्याचे तेथील एका कर्मचार्‍याने सांगितले. हजारो लोकांची भागू शकते तहान बिंदुसरा धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून दररोज १५ ते २० लाख लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. या वाया जाणार्‍या पाण्यावर शहरातील हजारो नागरिकांची तहान भागू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. म्हणे ! दोन महिन्यांपूर्वी केली पाहणी बिंदुसरा धरणाला पडलेल्या भगदाडाची दोन महिन्यापूर्वी नाशिक येथील पथकाने पाहणी केली असून या भिंतीची लवकरच दुरूस्ती करण्यात येईल, असे शाखा अभियंता डी.एम.कोकणे यांनी सांगितले. दोन महिन्यापासून अद्यापही या भिंतीची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भिंतीच्या दुरूस्तीला कधी मुहूर्त लागणार? पावसाळ्यात की धरणातील पाणी संपल्यावर? असा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत मुख्याधिकारी निलावाड म्हणाले, आम्ही याबाबत संबंधित विभागाला पत्र पाठविलेले आहे.