जिल्ह्यात सोमवारी ४४८२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यात ३२२४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर १२५८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १८८, आष्टी १४०, बीड ३१०, माजलगाव ८८,धारुर ७७, गेवराई ७५, केज १२८, परळी ५८, पाटोदा ७३, शिरुर ६१, वडवणीतील ६० जणांचा समावेश आहे.
एकूण बाधितांचा आकडा ६८ हजार ९७८ इतका झाला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६१ हजार ४२ इतकी झाली आहे. जुन्या ३५, तर नवीन २१ जणांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा १२१६ इतका झाला आहे. सध्या ६ हजार ७२० रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.