शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बीडच्या १२ हजार शेतकऱ्यांनी उचलले नांदेडचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पीएम किसान योजनेत देशाच्या सर्वच भागात अनेक गैरप्रकार झालेले समोर आले असतानाच आता नांदेड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : पीएम किसान योजनेत देशाच्या सर्वच भागात अनेक गैरप्रकार झालेले समोर आले असतानाच आता नांदेड जिल्ह्यातील ३० हजार बोगस लाभार्थ्यांमध्ये तब्बल १२ हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या १२ हजार ३३ व्यक्तींकडून तब्बल ६ कोटी ३५ लाख रुपये वसुलीचे आदेश नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सदर रक्कम वसूल करून द्यावी, असे निर्देश कृषी आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही तर गुन्हे दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना मासिक ५०० रुपये अनुदान देणारी पीएम किसान योजना जाहीर केली. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी घुसल्याचे आता ठिकठिकाणी समोर येत आहे. अनेक जिल्ह्यांत आयकर भरणाऱ्या व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होते. त्यामुळे अनेकांना आपली नावे या यादीत आहेत हेदेखील माहीत नाही. तर काहींनी जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यात या योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी करताना सुमारे ३० हजार लाभार्थी अपात्र असतानाही त्यांना या योजनेचा लाभ दिल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा पुढील लाभ थांबविण्यात आला आहे. मात्र, या ३० हजार लाभार्थ्यांमध्ये तब्बल १२ हजार ३३ लाभार्थी बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अनुदानाची रक्कमदेखील बीड जिल्ह्यातील बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यांनतर सदर बाब उघड झाली आहे. बीड जिल्ह्यातील सुमारे १२ हजार लाभार्थ्यांकडून तब्बल ६ कोटी ३५ लाख रुपये वसूल करून ते नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करावेत, असे निर्देश आता राज्याच्या कृषी आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

---

बीड जिल्ह्यातीलच वसुली थकली

बीड जिल्ह्यातही या योजनेचा तब्बल ३६ हजार ५९४ अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे चित्र आहे. यांच्याकडून तब्बल २१ कोटी ८६ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश आहेत. मात्र, आतापर्यंत यापैकी केवळ २७८९ व्यक्तींकडून २ कोटी ६६ लाख इतकीच रक्कम वसूल झाली आहे. उर्वरित ३३ हजार व्यक्तींकडून आणखी १९ कोटी रुपयांची वसुली करायची आहे. बीड जिल्हा प्रशासनाला तीच वसुली होत नसताना आता नांदेड जिल्ह्यात अनुदान घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची अवस्था ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ अशी झाली आहे.

.........

पीएम किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या संदर्भात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. यासंदर्भात चौकशी केली जाईल. ज्यांना हे पैसे मिळाले आहेत. त्यांनी ते शासनाला परत करावेत अन्यथा पुढील कारवाई केली जाईल.

-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड.