शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

११४ कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन ...

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कंत्राटदाराशी संगनमत असल्याने झालेले कामही निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याचा फटका सामान्य बीडकरांना सहन करावा लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वत्र करण्यात आली. बीडमध्ये ११४ कोटी ६३ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. याचा कार्यारंभ आदेश १९ नोव्हेंंबर २०१७ ला लातूरच्या कंत्राटदाराला देण्यात आला. आदेश दिल्यापासून हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तीन वर्षे उलटूनही अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेेले नाही. ज्या ठिकाणी काम झाले, तेथेही निकृष्ट काम झाल्याच्या तक्रारी शहरवासीयांनी नगरपालिकेकडे केल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजनेच्या कामात हलगर्जी केल्याचा आरोप होत आहे.

६० किमीचे काम अद्यापही अपूर्णच

ही पाणी पुरवठा योजना २४० किलो मीटरची आहे; परंतु एवढ्या वर्षात आतापर्यंत केवळ १८० किमीचे काम पूर्ण झाल्याचा दावा मजीप्रा करीत आहे. अद्यापही ६० किमीचे काम अपूर्णच आहे. त्यातही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितल्या जात आहेत. यावरून मजीप्राच्या कामातील गती दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

नगराध्यक्षांनी घेतली बैठक

या योजनेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मजीप्रा, पाणी पुरवठा विभाग यांची बैठक घेतली. यात पाण्याची टाकी व इतर सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या, तसेच धरण क्षेत्रातील पाइपलाइनची कामे उसतोडणी झाल्यास तत्काळ पूर्ण करण्यासही सांगितले. रस्ता दुरुस्तीची कामे शहरातील कोणत्या भागात झाली, याचा लेखी स्वरूपात देण्यासह डॉ. क्षीरसागर यांनी मजीप्राला सांगितले. यावेळी पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, सभापती, मजीप्रा अधिकारी यांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी बीडकरांची ओरड

मागील तीन वर्षांपासून अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असूनही अद्याप ते अपूर्णच आहे. त्यामुळे शहरात आजही ८ ते १० दिवसाला पाणी येते. धरणात पाणी असतानाही केवळ जलवाहिणी व्यवस्थित नसल्याने आणि योजना अपूर्ण असल्याने बीडकरांमधून पाण्यासाठी ओरड होत आहे.

कोट

तांत्रिक बदल आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असल्याने उशीर झाला. एका ठिकाणी पाण्याच्या टाकीचा प्रश्नही होता. आता जागा बदलल्याने डिझाईन बदलावी लागली. त्यामुळे उशीर होत आहे. ही योजना २४० किमीची असून, १८० किमीचे काम पूर्ण झाले आहे.

गौरव चक्के

कार्यकारी अभियंता, मजीप्रा बीड.