शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

११४ कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन ...

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कंत्राटदाराशी संगनमत असल्याने झालेले कामही निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याचा फटका सामान्य बीडकरांना सहन करावा लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वत्र करण्यात आली. बीडमध्ये ११४ कोटी ६३ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. याचा कार्यारंभ आदेश १९ नोव्हेंंबर २०१७ ला लातूरच्या कंत्राटदाराला देण्यात आला. आदेश दिल्यापासून हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तीन वर्षे उलटूनही अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेेले नाही. ज्या ठिकाणी काम झाले, तेथेही निकृष्ट काम झाल्याच्या तक्रारी शहरवासीयांनी नगरपालिकेकडे केल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजनेच्या कामात हलगर्जी केल्याचा आरोप होत आहे.

६० किमीचे काम अद्यापही अपूर्णच

ही पाणी पुरवठा योजना २४० किलो मीटरची आहे; परंतु एवढ्या वर्षात आतापर्यंत केवळ १८० किमीचे काम पूर्ण झाल्याचा दावा मजीप्रा करीत आहे. अद्यापही ६० किमीचे काम अपूर्णच आहे. त्यातही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितल्या जात आहेत. यावरून मजीप्राच्या कामातील गती दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

नगराध्यक्षांनी घेतली बैठक

या योजनेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मजीप्रा, पाणी पुरवठा विभाग यांची बैठक घेतली. यात पाण्याची टाकी व इतर सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या, तसेच धरण क्षेत्रातील पाइपलाइनची कामे उसतोडणी झाल्यास तत्काळ पूर्ण करण्यासही सांगितले. रस्ता दुरुस्तीची कामे शहरातील कोणत्या भागात झाली, याचा लेखी स्वरूपात देण्यासह डॉ. क्षीरसागर यांनी मजीप्राला सांगितले. यावेळी पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, सभापती, मजीप्रा अधिकारी यांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी बीडकरांची ओरड

मागील तीन वर्षांपासून अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असूनही अद्याप ते अपूर्णच आहे. त्यामुळे शहरात आजही ८ ते १० दिवसाला पाणी येते. धरणात पाणी असतानाही केवळ जलवाहिणी व्यवस्थित नसल्याने आणि योजना अपूर्ण असल्याने बीडकरांमधून पाण्यासाठी ओरड होत आहे.

कोट

तांत्रिक बदल आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असल्याने उशीर झाला. एका ठिकाणी पाण्याच्या टाकीचा प्रश्नही होता. आता जागा बदलल्याने डिझाईन बदलावी लागली. त्यामुळे उशीर होत आहे. ही योजना २४० किमीची असून, १८० किमीचे काम पूर्ण झाले आहे.

गौरव चक्के

कार्यकारी अभियंता, मजीप्रा बीड.