शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

११४ कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन ...

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कंत्राटदाराशी संगनमत असल्याने झालेले कामही निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याचा फटका सामान्य बीडकरांना सहन करावा लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वत्र करण्यात आली. बीडमध्ये ११४ कोटी ६३ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. याचा कार्यारंभ आदेश १९ नोव्हेंंबर २०१७ ला लातूरच्या कंत्राटदाराला देण्यात आला. आदेश दिल्यापासून हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तीन वर्षे उलटूनही अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेेले नाही. ज्या ठिकाणी काम झाले, तेथेही निकृष्ट काम झाल्याच्या तक्रारी शहरवासीयांनी नगरपालिकेकडे केल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजनेच्या कामात हलगर्जी केल्याचा आरोप होत आहे.

६० किमीचे काम अद्यापही अपूर्णच

ही पाणी पुरवठा योजना २४० किलो मीटरची आहे; परंतु एवढ्या वर्षात आतापर्यंत केवळ १८० किमीचे काम पूर्ण झाल्याचा दावा मजीप्रा करीत आहे. अद्यापही ६० किमीचे काम अपूर्णच आहे. त्यातही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितल्या जात आहेत. यावरून मजीप्राच्या कामातील गती दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

नगराध्यक्षांनी घेतली बैठक

या योजनेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मजीप्रा, पाणी पुरवठा विभाग यांची बैठक घेतली. यात पाण्याची टाकी व इतर सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या, तसेच धरण क्षेत्रातील पाइपलाइनची कामे उसतोडणी झाल्यास तत्काळ पूर्ण करण्यासही सांगितले. रस्ता दुरुस्तीची कामे शहरातील कोणत्या भागात झाली, याचा लेखी स्वरूपात देण्यासह डॉ. क्षीरसागर यांनी मजीप्राला सांगितले. यावेळी पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, सभापती, मजीप्रा अधिकारी यांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी बीडकरांची ओरड

मागील तीन वर्षांपासून अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असूनही अद्याप ते अपूर्णच आहे. त्यामुळे शहरात आजही ८ ते १० दिवसाला पाणी येते. धरणात पाणी असतानाही केवळ जलवाहिणी व्यवस्थित नसल्याने आणि योजना अपूर्ण असल्याने बीडकरांमधून पाण्यासाठी ओरड होत आहे.

कोट

तांत्रिक बदल आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असल्याने उशीर झाला. एका ठिकाणी पाण्याच्या टाकीचा प्रश्नही होता. आता जागा बदलल्याने डिझाईन बदलावी लागली. त्यामुळे उशीर होत आहे. ही योजना २४० किमीची असून, १८० किमीचे काम पूर्ण झाले आहे.

गौरव चक्के

कार्यकारी अभियंता, मजीप्रा बीड.