शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
3
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
4
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
5
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
6
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
7
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
8
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
9
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
10
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
15
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
16
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
17
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
18
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
19
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
20
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

११४ कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन ...

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कंत्राटदाराशी संगनमत असल्याने झालेले कामही निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याचा फटका सामान्य बीडकरांना सहन करावा लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वत्र करण्यात आली. बीडमध्ये ११४ कोटी ६३ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. याचा कार्यारंभ आदेश १९ नोव्हेंंबर २०१७ ला लातूरच्या कंत्राटदाराला देण्यात आला. आदेश दिल्यापासून हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तीन वर्षे उलटूनही अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेेले नाही. ज्या ठिकाणी काम झाले, तेथेही निकृष्ट काम झाल्याच्या तक्रारी शहरवासीयांनी नगरपालिकेकडे केल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजनेच्या कामात हलगर्जी केल्याचा आरोप होत आहे.

६० किमीचे काम अद्यापही अपूर्णच

ही पाणी पुरवठा योजना २४० किलो मीटरची आहे; परंतु एवढ्या वर्षात आतापर्यंत केवळ १८० किमीचे काम पूर्ण झाल्याचा दावा मजीप्रा करीत आहे. अद्यापही ६० किमीचे काम अपूर्णच आहे. त्यातही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितल्या जात आहेत. यावरून मजीप्राच्या कामातील गती दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

नगराध्यक्षांनी घेतली बैठक

या योजनेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मजीप्रा, पाणी पुरवठा विभाग यांची बैठक घेतली. यात पाण्याची टाकी व इतर सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या, तसेच धरण क्षेत्रातील पाइपलाइनची कामे उसतोडणी झाल्यास तत्काळ पूर्ण करण्यासही सांगितले. रस्ता दुरुस्तीची कामे शहरातील कोणत्या भागात झाली, याचा लेखी स्वरूपात देण्यासह डॉ. क्षीरसागर यांनी मजीप्राला सांगितले. यावेळी पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, सभापती, मजीप्रा अधिकारी यांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी बीडकरांची ओरड

मागील तीन वर्षांपासून अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असूनही अद्याप ते अपूर्णच आहे. त्यामुळे शहरात आजही ८ ते १० दिवसाला पाणी येते. धरणात पाणी असतानाही केवळ जलवाहिणी व्यवस्थित नसल्याने आणि योजना अपूर्ण असल्याने बीडकरांमधून पाण्यासाठी ओरड होत आहे.

कोट

तांत्रिक बदल आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असल्याने उशीर झाला. एका ठिकाणी पाण्याच्या टाकीचा प्रश्नही होता. आता जागा बदलल्याने डिझाईन बदलावी लागली. त्यामुळे उशीर होत आहे. ही योजना २४० किमीची असून, १८० किमीचे काम पूर्ण झाले आहे.

गौरव चक्के

कार्यकारी अभियंता, मजीप्रा बीड.