शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

११ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ४८ मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

बीड : जूनमध्ये १७ दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैमध्येही हात अखडता घेतल्याचे दिसत आहे. मागील ११ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ...

बीड : जूनमध्ये १७ दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैमध्येही हात अखडता घेतल्याचे दिसत आहे. मागील ११ दिवसांत जिल्ह्यात सरासरी केवळ ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत हा आकडा वाढणारा दिसत असला तरी खरिपाच्या पिकांसाठी दमदार पावसाची गरज आहे.

यंदा पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. ८ ते १२ जूनदरम्यान पावसाने आगमनाची हजेरी लावली. मात्र त्यानंतर १२ दिवस पावसाने दडी मारली. पुन्हा दोन-तीन दिवस तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे कोवळी पिके धोक्यात आली होती. जूनमध्ये अपेक्षित पाऊस १२८.४ मि.मी. सरासरी पाऊस झाला; तर जुलैमधील ११ दिवसांत ४८.६ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

दि. १ ते ११ जुलैदरम्यान बीड तालुक्यात २७.३, पाटोदा ७२, आष्टी ७४, गेवराई ३६, माजलगाव ५०, अंबाजोगाई ४३, केज ५७, परळी ३०, धारूर १००, वडवणी ४७, तर शिरूर तालुक्यात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.१ मि.मी. आहे. आतापर्यंत २४९.९ मि.मी. पाऊस झाला आहे.

उजनी, पट्टी वडगावात पावसाचे पुनरागमन

उजनी : पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविल्याने कोवळी पिके ऊन धरू लागली होती. अंबाजोगाई तालुक्यातील उजनी, पट्टीवडगाव परिसरामध्ये पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके करपून जाण्याची भीती निर्माण झाली होती. रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू झाल्याने परिसरातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

दुबार पेरणीचे संकट टळले

दरम्यान, रविवारी जिल्ह्यात अंबाजोगाई, माजलगाव, परळी तालुक्यांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. अंबाजोगाई तालुक्यातील राडी-दैठणा पुलावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली.

सायंकाळी माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. केज तालुक्यात पावसाची रिमझिम चालू बीड, गेवराई शहरासह परिसरात पावसाची भुरभुर सुरू होती. रविवारी पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले असून, बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

110721\11_2_bed_20_11072021_14.jpeg

अंबाजाेगाई तालुक्यात राडी-दैठणा पुलावर पावसामुळे मोठया प्रमाणात पाणी आले असल्याने वाहतूक ठप्प झाली आहेी