शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

तारुण्यातील तणाव देतो उतारवयात त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:18 IST

जसं जसं वय वाढत जाते तशी आपली शारीरिक हालचाल आणि बौद्धिक क्...

जसं जसं वय वाढत जाते तशी आपली शारीरिक हालचाल आणि बौद्धिक क्षमता कमी होते. आपला आहार, आणि व्यायामाच्या आपल्या उतारवयातील आरोग्यावर परिणाम होत असतो. वाढत्या वयानुसार आपली स्मरणशक्ती, आकलनशक्ती कमी होण्याला 'मानसिक वार्धक्य' म्हणतात. सुरुवातीच्या रिसर्चमध्ये आहार आणि बुद्धिला चालना देणार्‍या खेळांचा वय वाढीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र नवीन संशोधनातून असे समोर आले की, तणावग्रस्त जीवन अनुभवलेल्या लोकांमध्ये मानसिक वार्धक्याची तिव्रता जास्त असते. तरुणपणी तणावपूर्ण नोकरी, मानसिक तणावात्मक अनुभवांना सामोरे जावे लागले तर त्याचे अनिष्ट परिणाम वृद्धापकाळात पाहायला मिळतात. तणाव निर्माण करणार्‍या अनेक बाबींचा यावेळी विचार करण्यात आला. जसे की, प्रिय व्यक्तिचा मृत्यू, मानसिक आजार, सामाजिक सवयी किंवा भौगोलिक स्थलांतर अशा अनेक कारणांमुळे जीवन स्ट्रेसफुल बनते.कठिण जीवन जगलेल्या ६0 ते ८0 वयोगटातील वृद्ध लोकांचा अभ्यास करता असे लक्षात आले की, तरुण असताना सामान्य, आनंदी जीवन जगलेल्या लोकांच्या तुलनेत त्यांचे मानसिक आरोग्य खालावलेले होते. विशेष म्हणजे, तरुणपणे अशा तणावाचा आपल्या मेंदूवर काही परिणाम होत नाही. मात्र जसे वय वाढते, तसे परिणाम दिसू लागतात.त्यामुळे म्हातारपणी आनंदी, स्वच्छंदी, निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आजपासूनच तणावापासून दूर राहा. खेळणे, व्यायाम, छंद, ध्यान, उत्तम आहार, प्रेम या गोष्टी आपला स्ट्रेस तणाव कमी करतात.