शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

तांदळाच्या पाण्याने दूर करा केसांच्या 'या' 4 समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:00 IST

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये किंवा आहारामध्ये भाताचा प्रामुख्याने सामावेश करण्यात येतो. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाची शेतीही तयार करण्यात येते. एवढचं नाही तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी तांदळाचे अनेक फायदेही सांगितले जातात.

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये किंवा आहारामध्ये भाताचा प्रामुख्याने सामावेश करण्यात येतो. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाची शेतीही तयार करण्यात येते. एवढचं नाही तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी तांदळाचे अनेक फायदेही सांगितले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? भात फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतो. तांदूळ शिजवल्यानंतर किंवा धुतल्यानंतर तांदळाचं जे पाणी शिल्लक राहतं ते काही लोक फेकून देतात. पण हेच पाणी चेहऱ्यासोबतच केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही या पाण्याचा उपयोग करण्यात येतो. 

आपलं सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. केसांचं सौंदर्य आणि आरोग्य राखण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण त्याचा फायदाच होत नाही. अशातच तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणाल की, तांदळाच्या पाण्यामध्ये असं काय असतं ज्यामुळे केस मुलायम, दाट होण्यास मदत होते? खरं तर तांदळाच्या पाण्यामध्ये स्टार्च आणि केसांसाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असतात. ही तत्व केस चमकदार करण्यासाठी, त्यांच्या मजबूतीसाठी आणि त्यांच्या वाढिसाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊयाच नेमका तांदळाचं पाणी केसांसाठी कसं फायदेशीर ठरतं त्याबाबत....

केस तुटणं होइल बंद 

जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर आपल्या केसांना तांदळाच्या पाण्याने मसाज करा. त्यामुळे केसांची मूळं हेल्दी होण्यास मदत होते. अनेकदा केस फार कमजोर होतात, परिणामी केस गळण्याचं प्रमाण वाढतं. शरीरातील अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे असं होतं. अशातच केसांना जास्त पोषण देण्यासाठी तांदळाच्या पाण्यामध्ये काही एसेन्शिअल ऑइल एकत्र करू शकता. 

कोरडे आणि अनहेल्दी केस 

अनेकदा सतत बाहेर राहिल्यामुळे धूळ, माती किंवा केमिकलयुक्त शॅम्पूमुळे केस कोरडे आणि अनहेल्दी होतात. त्यामुळे ते निस्तेज दिसू लागतात. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर शॅम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्याने हलक्या हाताने स्काल्पला मसाज करा. पाच मिनिटांसाठी हे असंच ठेवून नंतर साध्या पाण्याने केस धुवून टाका.

केसांमधील कोंडा दूर करा

जर तुम्ही केसांमधील कोंड्यामुळे त्रस्त असाल तर तांदळाचं पाणी या समस्येपासून सुटका करण्यासाठी मदत करेल. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तांदळाच्या पाण्यामध्ये थोडी शिकेखाई एकत्र करा. काही वेळ तसंचं ठेवल्याने स्वच्छ पाण्याने केस धुवून टाका. जर केसांमध्ये सतत खाज येत असेल तर छोटा कांदा नारळाच्या तेलासोबत उकळून केसांना लावा. नंतर केसांना बेसन आणि तांदळाच्या पाण्याने धुवून टाका.

केस मुलायम करण्यासाठी

शॅम्पू केस स्वच्छ करण्यासाठी आणि सिल्की सॉफ्ट करण्यासाठी वापरण्यात येतो. परंतु हानिकारक केमिकल्समुळे याचा वापर करणं केसांसाठी हानिकारक ठरतं. पण तुम्हाला माहीत आहे का? तांदळाचं पाणी एक उत्तम शॅम्पूही आहे. यामध्ये आवळ्याची पावजर, शिकेखाई किंवा संत्र्याच्या सालींची पावडर एकत्र करून त्याने केस धुवा. त्यामुळे केस मुलायम होण्यास मदत होते. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स