शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

'या' कारणांमुळे तुमचे केस होतात पातळ आणि कमजोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 11:07 IST

केसांबाबतच्या समस्यांचा सामना सर्वात जास्त महिलांना करावा लागतो. प्रत्येकालाच दाट, सुंदर, मजबूत केस हवे असतात पण काही चुकांमुळे केस कमजोर आणि पांढरे होऊ लागतात.

(Image Credit : SafeandHealthylife)

केसांबाबतच्या समस्यांचा सामना सर्वात जास्त महिलांना करावा लागतो. प्रत्येकालाच दाट, सुंदर, मजबूत केस हवे असतात पण काही चुकांमुळे केस कमजोर आणि पांढरे होऊ लागतात. यावर वेगवेगळे उपाय केले जातात. पण या उपायांचा काही फायदा होतोच असे नाही. 

बदलत्या जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुले केस कमजोर होऊ लागतात. आहारातून आवश्यक पोषत तत्व मिळत नसल्याने केसांची समस्या होते. तसेच लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. केसांची समस्या दूर करायची असेल तर त्याआधी केस खराब होण्याची कारणे जाणून घेतली पाहिजे. 

केसांना तेल लावण्याची पद्धत

केसांना तेल लावणे फायदेशीर असतं. पण चुकीच्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणात तेल लावल्याने केस कमजोर होऊ लागतात. केसांना जास्त प्रमाणात तेल लावल्याने केसांची योग्य पद्धतीने स्वच्छता होऊ शकत नाही आणि त्यामुळे केसांच्या मुळात पुरेशी हवा पोहोचत नाही. अशात केस कमजोर होऊ लागतात. केस जर मजबूत ठेवायचे असतील तर आठवड्यातून २ पेक्षा अधिक वेळा तेल लावू नये. 

केसांची स्वच्छता

केसांचं सर्वात जास्त नुकसान धूळ-माती यामुळे होतं. केसांबाबत जे लोक सजग असतात ते योग्यप्रकारे केसांची स्वच्छता करतात. पण काही लोक हे केवळ शॅम्पू करणेच केसांची स्वच्छता मानतात. वास्तविक पाहता केसांना शॅम्पू करण्यासोबतच योग्य पद्धतीने केस करणेही महत्त्वाचं असतं. कंगव्याच्या माध्यमातून केसांच्या मुळात असलेली धूळ-माती स्वच्छ केली जाते. 

केसांमध्ये केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर

केसांना सर्वात जास्त कमजोर जर काही करत असेल तर ते आहे केमिकल प्रॉडक्ट्स. अलिकडे केसांना वेगवेगळे लूक देण्यासाठी हेअर स्प्रे, जेलचा वापर केला जातो. याने केसांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे केमिकलमुळे केस कमजोर होतात. 

हेअर ब्लीचिंग आणि हेअर कलर

स्टाइल आणि लूकसाठी लोक केसांना वेगवेगळे कलर लावतात. कलर व्यतिरीक्त ब्लीचिंगचा वापरही लोक केसांवर करू लागले आहेत. केसांमध्ये पुन्हा पुन्हा ब्लीचिंग केल्याने केसांची नैसर्गिक चमक दूर होते आणि केस निर्जिव-रखरखीत होतात. केसा कमजोर होण्यापासून वाचवायचे असतील तर हेअर कलर आणि ब्लीचिंग टाळलं पाहिजे. 

भिजलेल्या केसात कंगवा फिरवणे

काही लोकांना सवय असते की, ते भिजलेल्या केसांमध्ये कंगवा फिरवतात. पण हे चूक आहे. कारण असे केल्याने केसांच्या मुळाचं नुकसान होतं. केस तुटू लागतात. तसेच भिजलेल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्याने केस पातळ होऊ लागतात. 

हेअर ड्रायरचा अधिक वापर

रोज केस सुकवण्यासाठी तुम्ही जर हेअर ड्रायरचा वापर करत असाल तर तुम्हीच तुमच्या केसांचं नुकसान करताय. हेअर ड्रायरचा वापर कमी करायला हवा. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स