शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अंतिम क्षणी झालेल्या चुका महागात पडल्या, निसटलेल्या सुवर्णपदकाबाबत सिंधूनं व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 04:19 IST

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केली. जबरदस्त चुरशीचा झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अनेकांनी वर्षातील सर्वोत्तम महिला एकेरीचा सामना म्हणून पसंती दिली.

ग्लासगो : अंतिम क्षणी मोक्याच्या वेळी झालेल्या चुका मला महागात पडल्या आणि त्यामुळे माझ्या हातून ऐतिहासिक सुवर्णपदक निसटले, अशी खंत भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केली. जबरदस्त चुरशीचा झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अनेकांनी वर्षातील सर्वोत्तम महिला एकेरीचा सामना म्हणून पसंती दिली.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या सिंधूने सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराने अंतिम क्षणी सिंधूकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत २१-१९, २०-२२, २२-२० अशी बाजी मारली. निर्णायक गेममध्ये सामना २०-२० असा बरोबरीत असताना सिंधूला एका चुकीमुळे एक गुण गमवावा लागला आणि हाच गुण निर्णायक ठरला होता. या चुकीविषयी सांगताना सिंधू म्हणाली, ‘मी दु:खी आहे. तिसºया गेममध्ये २०-२० अशी बरोबरी असताना कोणीही विजयी ठरली असती. प्रत्येक जण सुवर्णपदकाचा निर्धार करून स्पर्धेत खेळत असतो आणि मी या पदकाच्या खूप जवळ आले होते, मात्र अंतिम क्षणामध्ये सर्व काही बदलले.’त्याचप्रमाणे, ‘ओकुहाराला नमवणे सोपे नाही. जेव्हा पण आम्ही एकमेकांविरुद्ध खेळलो, तेव्हा तो सामना सहजपणे पार पडला नाही. खूप मोठ्या आणि कडव्या रॅलीज खेळल्या गेल्या. तिला मी कधीही गृहीत धरले नाही. सामना लांबलचक खेळण्यासाठी मी सज्ज होते. परंतु, मला वाटते, की हा दिवस माझा नव्हता,’ असेही सिंधूने या वेळी म्हटले.स्पर्धेचा अंतिम सामना एक तास ४९ मिनिटांपर्यंत खेळला गेला. हा सामना थकवा आणणारा होता, असे सांगताना सिंधू म्हणाली, ‘हा सामना मानसिक आणि शारीरिकरीत्या खूप थकवणारा होता. प्रत्येक रॅली लांबलचक खेचली गेली आणि आमच्यापैकी कोणीही ढिलाई न देता कडवे आव्हान उभे केले. आम्ही १४-१४, १८-१८ अशा गुणांसह पुढे जात होतो आणि २०-२० अशा गुणसंख्येनंतर कोणीही विजयी होऊ शकत होते. हा खूप मोठा सामना होता, तसेच खूप चांगला सामना झाला, परंतु दुर्दैवाने मी जिंकू शकली नाही.’म्हणून सायना अपयशी ठरलीमला सायनाविषयी वाईट वाटते. तिला उपांत्य सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रात्री उशिरापर्यंत रंगला आणि पुन्हा सकाळी तिला उपांत्य सामन्यात खेळावे लागले. माझ्या मते स्पर्धेचे वेळापत्रक योग्य पद्धतीने आखले गेले नाही आणि यामुळे अनेक समस्या उद्भवल्या. टीव्हीनुसार स्पर्धेचे वेळापत्रक तयार केले गेले नाही पाहिजे. यासाठी मी तांत्रिक अधिकाºयांना जबाबदार धरेल. खेळाडूंना एका सामन्यानंतर थकवा घालवण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल, अशी योजना करायलाच पाहिजे. ही एक समस्या आहे जी अधिकाºयांपुढे ठेवली गेली पाहिजे. - विमलकुमार, सायनाचे प्रशिक्षकया स्पर्धेत दोन पदक जिंकण्यात यश मिळाल्याने भारतीय म्हणून आपल्याला अभिमान आहे. सायनानेही चांगले प्रदर्शन केले. देशासाठी मी रौप्य जिंकण्यात यशस्वी ठरले, याचा मला गर्व आहे. या कामगिरीनंतर मला आणखी आत्मविश्वास मिळाला असून भविष्यातही मी आणखी जेतेपद जिंकेल.- पी. व्ही. सिंधू