शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भारतीय बॅडमिंटनचा सुवर्णकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:04 IST

पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, सायना नेहवालसह अन्य बॅडमिंटनपटूंची आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी चमकदार होत आहे.

नागपूर : पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, सायना नेहवालसह अन्य बॅडमिंटनपटूंची आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी चमकदार होत आहे. त्यामुळे भारतीय बॅडमिंटनचा हा सुवर्णकाळ आहे, असे मत माजी आॅल इंग्लंडविजेते बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले. एसजेएएनतर्फे रविवारी आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.१९७२ मध्ये अर्जुन, तर १९८२ मध्ये पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरलेले पदुकोण म्हणाले, ‘सध्या भारतीय खेळाडूंची कामगिरी बघता हा भारतीय बॅडमिंटनचा सुवर्णकाळ आहे. युवा प्रतिभावान खेळाडू पुुढे येत आहेत. सब-ज्युनिअर पातळीवरही प्रतिभावान खेळाडू आहेत.’नागपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या ८२ व्या सिनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्याबाबत बोलताना पदुकोण म्हणाले, ‘बॅडमिंटनसाठी हे शुभसंकेत आहेत. कारण खेळ लोकप्रिय करण्याची जबाबदारी आघाडीच्या खेळाडूंवर आहे. माझे वैयक्तिक मत विचारात घेतले तर राष्ट्रीय स्पर्धेत आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग असायलाच हवा आणि भविष्यातही अव्वल खेळाडूंचा सहभाग कायम राहावा, असे वाटते.’ दुहेरीतील कामगिरीबाबत विचारले असता पदुकोण म्हणाले, ‘एकेरीच्या तुलनेत दुहेरीमध्ये आपली वाटचाल थोडी संथ आहे, पण योग्य दिशेने सुरू आहे.’

टॅग्स :Sportsक्रीडाBadmintonBadminton