शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

अव्वल स्थानापेक्षा राष्ट्रकुल पदक महत्त्वाचे- किदाम्बी श्रीकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:56 IST

चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या काही दिवस आधी श्रीकांत आजारी पडला होता. गोपीचंद अकादमीत तो बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला होता. आठवडाभर आयसीयूत ठेवल्यानंतर त्याला मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाले होते. या कटु स्मृती विसरून आज देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनलेला श्रीकांत देशासाठी पदक जिंकण्यास सज्ज आहे. त्याच्या नावावर चार प्रतिष्ठेची जेतेपदे आहेत, शिवाय त्याला नुकताच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.२०१४ ची घटना सांगताना श्रीकांत म्हणाला,‘ताप आल्यामुळे मी आजारी पडलो होतो. कुणीही मला त्या घटनेबद्दल सांगू इच्छित नाही. मी बरा होऊन राष्टÑकुलमध्ये खेळलो पण उपांत्यपूर्व फेरीामध्ये सिंगापूरच्या खेळाडूकडून पराभूत झालो. चार वर्षानंतर आता पदकाची आशा पल्लवित झाली आहे. मागील वर्षभरात मी आणखी अनुभवी बनलो. त्यामुळे राष्ट्रकुलचे पदक जिंकण्यास माझे प्राधान्य राहील. यंदा अव्वल स्थानावर पोहोचण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असेल ते राष्ट्रकुलचे पदक जिंकणे.’ (वृत्तसंस्था)भारताच्या खात्यात केवळ तीन पदकपारुपल्ली कश्यप याने ग्लास्गो राष्टÑकुलमध्ये सुवर्ण जिंकून ३२ वर्षानंतर पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी केली. यंदा श्रीकांतच्या खेळावर देशातील कोट्यवधी चाहत्यांची नजर असेल. कश्यपपूर्वी केवळ प्रकाश पदुकोण(१९७८) आणि सय्यद मोदी(१९८२)यांनी या खेळात राष्टÑकुल सुवर्ण जिंकले होते. श्रीकांत म्हणाला, मागच्यावेळी आम्ही चांगले पदक जिंकलो. यंदा चार वर्षांआधीच्या तुलनेत आघाडीवर असल्याने पदके जिंकण्याची शक्यता बळावली आहे.’

टॅग्स :BadmintonBadminton