शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल स्थानापेक्षा राष्ट्रकुल पदक महत्त्वाचे- किदाम्बी श्रीकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:56 IST

चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या काही दिवस आधी श्रीकांत आजारी पडला होता. गोपीचंद अकादमीत तो बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला होता. आठवडाभर आयसीयूत ठेवल्यानंतर त्याला मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाले होते. या कटु स्मृती विसरून आज देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनलेला श्रीकांत देशासाठी पदक जिंकण्यास सज्ज आहे. त्याच्या नावावर चार प्रतिष्ठेची जेतेपदे आहेत, शिवाय त्याला नुकताच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.२०१४ ची घटना सांगताना श्रीकांत म्हणाला,‘ताप आल्यामुळे मी आजारी पडलो होतो. कुणीही मला त्या घटनेबद्दल सांगू इच्छित नाही. मी बरा होऊन राष्टÑकुलमध्ये खेळलो पण उपांत्यपूर्व फेरीामध्ये सिंगापूरच्या खेळाडूकडून पराभूत झालो. चार वर्षानंतर आता पदकाची आशा पल्लवित झाली आहे. मागील वर्षभरात मी आणखी अनुभवी बनलो. त्यामुळे राष्ट्रकुलचे पदक जिंकण्यास माझे प्राधान्य राहील. यंदा अव्वल स्थानावर पोहोचण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असेल ते राष्ट्रकुलचे पदक जिंकणे.’ (वृत्तसंस्था)भारताच्या खात्यात केवळ तीन पदकपारुपल्ली कश्यप याने ग्लास्गो राष्टÑकुलमध्ये सुवर्ण जिंकून ३२ वर्षानंतर पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी केली. यंदा श्रीकांतच्या खेळावर देशातील कोट्यवधी चाहत्यांची नजर असेल. कश्यपपूर्वी केवळ प्रकाश पदुकोण(१९७८) आणि सय्यद मोदी(१९८२)यांनी या खेळात राष्टÑकुल सुवर्ण जिंकले होते. श्रीकांत म्हणाला, मागच्यावेळी आम्ही चांगले पदक जिंकलो. यंदा चार वर्षांआधीच्या तुलनेत आघाडीवर असल्याने पदके जिंकण्याची शक्यता बळावली आहे.’

टॅग्स :BadmintonBadminton