शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

वाहनचालनासाठी हवे संयमी कौशल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 13:50 IST

ड्रायव्हिंग येणे म्हणजे केवळ गाडीची तांत्रिकता ज्ञात असणे इतके मर्यादित नाही त्या कौशल्याबरोबर शांतवृत्ती, सहनशीलता व संयम हवा. तरच ते खरे ड्रायव्हिंग स्कील ठरेल.

वानचालकांची कमतरता हा भारतातील गंभीर विषय आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांची कमतरता हा देखील तितकाच गंभीर विषय आहे. पण याबाबत केवळ सरकारने नव्हे तर ज्याला ड्रायव्हिंग येते व ज्यांना ड्रायव्हिंग करायचे आहे,  त्या प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा. वाहतुकीचे नियम फारसे लक्षात न राहाण्या इतके कठीण नाहीत. परंतु जरा कुठे पुढे असलेली मोटार थांबली की मागच्या चालकाची चुळबूळ सुरू होते. काही वेळातच तो आपली कार असो की मोटारसायकल, ट्रक, टेंपो असो की मिनीबस वा बस, ती पुढे काढण्यासाठी आटापिटा सुरू करतो. मुंबई - गोवा या सारख्यया दुहेरी व विभाजक नसलेल्या महामार्गावर तर यामुळे अशाच प्रकारच्या वाहनचालकांच्या आट्यापिट्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. परंतु या साऱ्या प्रकाराबद्दल अनेकदा आपण दुसऱ्याला दोष देतो. चूकही आपणच करतो व खापर रस्त्यामध्ये वाढलेली वाहनांची संख्या, खराब रस्ते, वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष, मार्गावर असलेल्या गावांमध्ये लोक फार बेशिस्त आहेत, आठवडी बाजारही कसा वाहतूक कोंडीचे कारण असतो व अखेरीस सरकारचा दोष... अशा साऱ्या वर्तनातून आपण खरेच काय साधत असतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या कारणांमध्ये आपण प्रत्येक कारणीभूत असतो. प्रवासाच्या वेळेमध्ये वाया जाणाऱ्या काळाबद्दल मानसिक त्रास करून घेताना संयम बाळगायलाही शिकायला हवे. त्रागा करून घेतल्याने वाहनचालनावर परिणाम होत असतो. उतावळेपण वाढत असते. पण ते टाळणे आपल्याच हाती असते. वाहन चालवणे ही कला आहे, पण वाहन चालवताना सहनशक्ती वाढवणे, संयम ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, आपले वाहन व दुसऱ्याचा जीव सुरक्षित राहील असे वागणे ही या ड्रायव्हिंगच्या कौशल्याला आवश्यक व अपरिहार्य असणारी जोड आहे. हा 'जोडीदार' असल्याशिवाय कौशल्य कामाचे नाही, हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे. वाहनांची संख्या, विशिष्ट दिवसांमध्ये असणारा रस्ते वाहतुकीतील ताण ही यानंतरच्या काळातील अविभाज्य अशी वाहतूक व्यवस्था असणार आहे. त्यामुळेच वाहन , वाहनचालनाचे शिक्षण, पुन्हा पुन्हा रिव्हॅम्प करण्याचीही गरज असणार आहे. आता गणपती उत्सवाच्या काळात कोकणात, देशावर जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे तेव्हा ड्रायव्हिंगचा कस कसा लावायचा हे सर्व वाहनचालकांवर अवलंबून असणार आहे. भारतात तब्बल २२ लाख वाहनचालकांची कमतरता आहे असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच केले आहे. पण सध्याची वाहनचालकांच्या कौशल्याची स्थिती पाहाता, चालकांच्या कौशल्याला नव्याने उजाळा देण्याचीही गरज वाटते.