शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

सरळ जाण्यासाठी प्रतिबंध असेल तर जाऊ नकाच ...'नो एन्ट्री'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:45 IST

पथचिन्हे रस्त्यावरील नियमांना सर्वांनी समजून घ्यावे, यासाठी असतात. त्यामुळे नियमांच्या पालनाबरोबरच वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून बाहेर जाण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी व नागरिकांना सुसह्यता मिळावी यासाठी उपयोग होत असतो.

रस्ते वाहतूक आली म्हणजे कायदे, नियम या साऱ्या बाबी आल्या. त्या पाळायलाच पाहिजेत, किंबहुना नियमांचे पालन करणे हे प्रत्यक वाहनचालकाचे, पादचाऱ्यांचेही कर्तव्य आहे. आज दुर्दैवाने अनेक बाबतीत या साऱ्या नियमांचे पालन करण्यासाठी सांकेतिक चिन्हे असूनही लोकांकडून त्याचे पालन होत नाही. नियम व कायदेभंग करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे समजले जाते, हीच मोठी प्रत्येक नियमभंग करणाऱ्या भारतीय नागरिकांची खूण बनली आहे. आपल्या देशाच्या व्यवस्थेने तयार केलेले नियम पाळण्यासाठी असतात, हे न समजल्याने, न समजून घेतल्याने आणि ते जाणीवपूर्वक न पाळल्याने अपघातासारख्या अनेक दुर्दैवी घटना घडतात. अनेक नव्याच कशाला जुन्या वाहनचालकांनाही रस्त्यावरच्या पथचिन्हांची माहिती नसते. झटकन उमजत नाही. अशा चिन्हांची ओळख थोडक्यात करून देतानाच त्याचे तोटे व फायदे आपण पाहू. या लेखामध्ये'नो एन्ट्री' या चिन्हा बाबत माहिती करून घेऊ. सोबत दिलेले नो एन्ट्रीचे चिन्ह अनेक ठिकाणी आपल्याला दिसत असते. तसे ते चिन्ह कळत नाही, असे म्हणायला खरे म्हणजे कोणताही वाव नाही. निरक्षर माणसालाही ते समजेल, असे हे चिन्ह आहे. मात्र ते चिन्ह असूनही अनेकजण अनेकदा या चिन्हाकडे दुर्लक्ष करतात. समोर च्या एखाद्या रस्त्यावर वा मार्गावर जाण्यास प्रवेश बंद असला तरी त्या ठिकाणी कार वा अन्य लहान वाहन घुसवले जाते. यामुळे अनेकदा समोरून त्या रस्त्यावर येणारी वाहने येत असतात, त्यांना अडथळा होतो, त्या रस्त्यावर जाणाऱ्या वा येणाऱ्या, क्रॉस करणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होतो, अपघात होतो.इतकेच काय जर अशा रस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी झालेली असेल किंवा लोकांची गर्दी असेल तर मात्र अन्य व्यक्तींची व वाहनांची प्रचंड कुचंबणा होते. हे सारे टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे. केवळ अपघात टाळणे इतकाच अशी चिन्हे तयार करण्याचा हेतू नाही. तर या चिन्हांमुळे नागरी नियमांचे पालन केले जावे, लोकांनी नागरिकांप्रमाणे वागावे, एका नागरिकाचा दुसऱ्यास त्रास न होता, उलट सहकार्याचा भाव प्रकट होईल, तेव्हा पथचिन्हे ही पाळण्यासाठी असतात. ती समजून घ्या. नो एन्ट्री असेल तर तेथे प्रवेश न करणे,हेच अभिप्रेत असते. इतके समजण्याइतकी सज्ञानता नक्कीच सर्वांकडे असायला हवी. कारण त्यामुळेच तर शहरी जीवन व वाहतुकीतील शिस्त, प्रणाली यशस्वीपणे चालू शकेल.