शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरळ जाण्यासाठी प्रतिबंध असेल तर जाऊ नकाच ...'नो एन्ट्री'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:45 IST

पथचिन्हे रस्त्यावरील नियमांना सर्वांनी समजून घ्यावे, यासाठी असतात. त्यामुळे नियमांच्या पालनाबरोबरच वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून बाहेर जाण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी व नागरिकांना सुसह्यता मिळावी यासाठी उपयोग होत असतो.

रस्ते वाहतूक आली म्हणजे कायदे, नियम या साऱ्या बाबी आल्या. त्या पाळायलाच पाहिजेत, किंबहुना नियमांचे पालन करणे हे प्रत्यक वाहनचालकाचे, पादचाऱ्यांचेही कर्तव्य आहे. आज दुर्दैवाने अनेक बाबतीत या साऱ्या नियमांचे पालन करण्यासाठी सांकेतिक चिन्हे असूनही लोकांकडून त्याचे पालन होत नाही. नियम व कायदेभंग करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे समजले जाते, हीच मोठी प्रत्येक नियमभंग करणाऱ्या भारतीय नागरिकांची खूण बनली आहे. आपल्या देशाच्या व्यवस्थेने तयार केलेले नियम पाळण्यासाठी असतात, हे न समजल्याने, न समजून घेतल्याने आणि ते जाणीवपूर्वक न पाळल्याने अपघातासारख्या अनेक दुर्दैवी घटना घडतात. अनेक नव्याच कशाला जुन्या वाहनचालकांनाही रस्त्यावरच्या पथचिन्हांची माहिती नसते. झटकन उमजत नाही. अशा चिन्हांची ओळख थोडक्यात करून देतानाच त्याचे तोटे व फायदे आपण पाहू. या लेखामध्ये'नो एन्ट्री' या चिन्हा बाबत माहिती करून घेऊ. सोबत दिलेले नो एन्ट्रीचे चिन्ह अनेक ठिकाणी आपल्याला दिसत असते. तसे ते चिन्ह कळत नाही, असे म्हणायला खरे म्हणजे कोणताही वाव नाही. निरक्षर माणसालाही ते समजेल, असे हे चिन्ह आहे. मात्र ते चिन्ह असूनही अनेकजण अनेकदा या चिन्हाकडे दुर्लक्ष करतात. समोर च्या एखाद्या रस्त्यावर वा मार्गावर जाण्यास प्रवेश बंद असला तरी त्या ठिकाणी कार वा अन्य लहान वाहन घुसवले जाते. यामुळे अनेकदा समोरून त्या रस्त्यावर येणारी वाहने येत असतात, त्यांना अडथळा होतो, त्या रस्त्यावर जाणाऱ्या वा येणाऱ्या, क्रॉस करणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होतो, अपघात होतो.इतकेच काय जर अशा रस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी झालेली असेल किंवा लोकांची गर्दी असेल तर मात्र अन्य व्यक्तींची व वाहनांची प्रचंड कुचंबणा होते. हे सारे टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे. केवळ अपघात टाळणे इतकाच अशी चिन्हे तयार करण्याचा हेतू नाही. तर या चिन्हांमुळे नागरी नियमांचे पालन केले जावे, लोकांनी नागरिकांप्रमाणे वागावे, एका नागरिकाचा दुसऱ्यास त्रास न होता, उलट सहकार्याचा भाव प्रकट होईल, तेव्हा पथचिन्हे ही पाळण्यासाठी असतात. ती समजून घ्या. नो एन्ट्री असेल तर तेथे प्रवेश न करणे,हेच अभिप्रेत असते. इतके समजण्याइतकी सज्ञानता नक्कीच सर्वांकडे असायला हवी. कारण त्यामुळेच तर शहरी जीवन व वाहतुकीतील शिस्त, प्रणाली यशस्वीपणे चालू शकेल.