शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सरळ जाण्यासाठी प्रतिबंध असेल तर जाऊ नकाच ...'नो एन्ट्री'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:45 IST

पथचिन्हे रस्त्यावरील नियमांना सर्वांनी समजून घ्यावे, यासाठी असतात. त्यामुळे नियमांच्या पालनाबरोबरच वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून बाहेर जाण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी व नागरिकांना सुसह्यता मिळावी यासाठी उपयोग होत असतो.

रस्ते वाहतूक आली म्हणजे कायदे, नियम या साऱ्या बाबी आल्या. त्या पाळायलाच पाहिजेत, किंबहुना नियमांचे पालन करणे हे प्रत्यक वाहनचालकाचे, पादचाऱ्यांचेही कर्तव्य आहे. आज दुर्दैवाने अनेक बाबतीत या साऱ्या नियमांचे पालन करण्यासाठी सांकेतिक चिन्हे असूनही लोकांकडून त्याचे पालन होत नाही. नियम व कायदेभंग करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे समजले जाते, हीच मोठी प्रत्येक नियमभंग करणाऱ्या भारतीय नागरिकांची खूण बनली आहे. आपल्या देशाच्या व्यवस्थेने तयार केलेले नियम पाळण्यासाठी असतात, हे न समजल्याने, न समजून घेतल्याने आणि ते जाणीवपूर्वक न पाळल्याने अपघातासारख्या अनेक दुर्दैवी घटना घडतात. अनेक नव्याच कशाला जुन्या वाहनचालकांनाही रस्त्यावरच्या पथचिन्हांची माहिती नसते. झटकन उमजत नाही. अशा चिन्हांची ओळख थोडक्यात करून देतानाच त्याचे तोटे व फायदे आपण पाहू. या लेखामध्ये'नो एन्ट्री' या चिन्हा बाबत माहिती करून घेऊ. सोबत दिलेले नो एन्ट्रीचे चिन्ह अनेक ठिकाणी आपल्याला दिसत असते. तसे ते चिन्ह कळत नाही, असे म्हणायला खरे म्हणजे कोणताही वाव नाही. निरक्षर माणसालाही ते समजेल, असे हे चिन्ह आहे. मात्र ते चिन्ह असूनही अनेकजण अनेकदा या चिन्हाकडे दुर्लक्ष करतात. समोर च्या एखाद्या रस्त्यावर वा मार्गावर जाण्यास प्रवेश बंद असला तरी त्या ठिकाणी कार वा अन्य लहान वाहन घुसवले जाते. यामुळे अनेकदा समोरून त्या रस्त्यावर येणारी वाहने येत असतात, त्यांना अडथळा होतो, त्या रस्त्यावर जाणाऱ्या वा येणाऱ्या, क्रॉस करणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होतो, अपघात होतो.इतकेच काय जर अशा रस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी झालेली असेल किंवा लोकांची गर्दी असेल तर मात्र अन्य व्यक्तींची व वाहनांची प्रचंड कुचंबणा होते. हे सारे टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे. केवळ अपघात टाळणे इतकाच अशी चिन्हे तयार करण्याचा हेतू नाही. तर या चिन्हांमुळे नागरी नियमांचे पालन केले जावे, लोकांनी नागरिकांप्रमाणे वागावे, एका नागरिकाचा दुसऱ्यास त्रास न होता, उलट सहकार्याचा भाव प्रकट होईल, तेव्हा पथचिन्हे ही पाळण्यासाठी असतात. ती समजून घ्या. नो एन्ट्री असेल तर तेथे प्रवेश न करणे,हेच अभिप्रेत असते. इतके समजण्याइतकी सज्ञानता नक्कीच सर्वांकडे असायला हवी. कारण त्यामुळेच तर शहरी जीवन व वाहतुकीतील शिस्त, प्रणाली यशस्वीपणे चालू शकेल.