शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

गाडीसाठी पाण्याचा अपव्यय टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 18:35 IST

आपली कार चकाचक असावी असे वाटणं साहजिक आहे, पण सध्या पाण्याचे असणारे महत्त्व लक्षात घ्या. त्यामुळे पाण्याचा वापर कार धुण्यासाठी करताना जपूनच करा. आज पाणी वाचवाल तर उद्या पाणी मिळणार आहे.

आपली कार चकाचक असावी असे वाटणं साहजिक आहे, पण सध्या पाण्याचे असणारे महत्त्व लक्षात घ्या. त्यामुळे पाण्याचा वापर कार धुण्यासाठी करताना जपूनच करा. आज पाणी वाचवाल तर उद्या पाणी मिळणार आहे. आवश्यकता नसल्यास कार धुतली नाही तर काही फरक पडणार नाही. पावसाळ्यामध्ये रोज कार वापरणाऱ्यांना तर आपली कार बाहेरून खराब झाली आहे असे दिसले की लगेच ती पाण्याने धुवायची लहर येते. अगदी दुसऱ्या दिवशी कारने कुठेही जाणार नसला तरी कार धुण्याचा परिपाठ करणारे लोक कमी नाहीत. खरे म्हणजे तुमच्या कार धुण्यामुळे कारची ताकद व कार्यक्षमता वाढणार नसते. शहरांमध्ये अनेक जण सकाळी कार स्वत: हून धुतात किंवा रोज त्याकामासठी माणूस नेमतात. खरे म्हणजे कार स्वच्छ असली तरी नित्याने रोज ती धुवायला हवी असा दंडकच जणू काही लोकांनी घालून घेतलेला असतो.पाणी हे जीवन आहे. अनेक ठिकाणी महापालिका किंवा नगरपालिका पाणी पुरवठा करतात ते पाणी पिण्याचे असते. त्यामुळे तसे पाणी बिनदिक्कतपणे कार धुण्यासाठी वापरण्यापूर्वी दहावेळा विचार करा. वैयक्तिक वापराची कार रोजच्या रोज स्वच्छ ठेवण्यासाठी काही गोष्टी करा. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल. रोज साध्या फडक्याने वा बाहेर विकत मिळणाऱ्या मायक्रो फायबरच्या ब्रशने कार साफ करा. त्यानंतर बाटलीचा स्प्रे वापरून त्याद्वारे साध्या पाण्याचा मारा कारच्या पृष्ठभागावर करा व लगेच स्पंज वा ओलसर फडक्याने पुसून घ्या व लगेच सुक्या फडक्याने पुसून घ्या. थोडे कष्ट जास्त पडतील पण तेवढाच व्यायामही होईल व पाण्याचा अनावश्यक वापर वाचेल. दररोज अशा प्रकारे केल्यास किंवा दिवसाआड अशी गाडी स्वच्छ केल्यास पाणीही वाचेल. जास्तीतजास्त दोन लीटर पाण्यात गाडी स्वच्छ होईल. गाडी अधिक खराब असेल तर महिन्यातून एकदा वॉशिंग सेंटरवर नेऊन धुऊन घेता येईल. पावसाळ्यात कितीही रोज गाडी धुतली तरी खराब होणारच आहे. ग्रामीण भागात गेल्यानंतर परत शहरात येताच गाडी घुवून व क्लिनिंग करून घ्या, त्यामुळे चिखल, धूळ यापासून गाडी मुक्त होईल. अर्थात रोज कार्यालयात गाडी घेऊन जाणाऱ्याना त्यांच्या प्रेस्टिजप्रमाणे गाडीवर खर्च करायला लागत असेल तर तो भाग वेगळा. व्यावसायिक वापर असलेल्यांना गाडी स्वच्छ व चकाचक ठेवावी लागतेच त्याला मात्र इलाज नाही. परंतु वैयक्तिक व दररोज वापर न करणाऱ्यांना अनावश्यक पाणी वापरणे टाळता येऊ शकते.