शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची सवारी जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 16:54 IST

लांबवर व शहराबाहेरच्या मोटारसायकलीचा प्रवास म्हणजे तरुणांचा उत्साही भाग असतो. पण अशी रपेट करताना संयम हाच सक्षम ड्रायव्हिंगचे मुख्य लक्षण असते.

मस्तपैकी लांबच्या प्रवासाचा आनंद घ्यावा, मित्रांच्या बरोबर पिकनिक काढावी शहराबाहेरचा वारा प्यावा, आजूबाजूच्या हिरवाईला डोळेभरून साठवावे, यासाठी मोटारसायकलीवरून मनसोक्त भटकावे, अशी इच्छा अनेक तरुणांच्या मनात असते.गणपती आले की अनेकांना आपल्या मोटारसायकलवर किंवा स्कूटरवर स्वार होऊन कोकणात किंवा आपल्या गावाला जावेसे वाटते. शहरी वाहतुकीपासून दूर रपेट करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी घरच्यांचा विरोध डावलून वा सेफ चालवीन, काळजी नको असे आश्वासन देऊन या गावाकडच्या टूरला जाणारे तरुण आजही कमी नाहीत, उलट वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी हाताने गीयर टाकायच्या १५० सी सीच्या स्कूटर्सही होत्या. त्या स्कूटर्सची ताकद व रफटफपणा आजच्या स्कूटर्समध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे. पण लांब प्रवासाला जाता येईल अशा मोटारसायकलींना तोटा नाही. काही असले तरी तरुणाईचा जोश व रग आजही कायम आहे.

अशी ही रफटफ बाईक प्रवासाची हौस अनुभवताना कमालीची दक्षता घ्यावी लागते. एकंदर वाहनांचा वेग वाढला असला तरी रस्ते काही सर्वत्र छान झाले आहेत असे अजिबात नाही.मोटारसायकलवरून जाताना अनेक प्रकारची चिंता असते ती मनात ठेवूनच तयारीने जावे हे महत्त्वाचे. तसेच गतीवर नियंत्रण, सावधपणे ओव्हरटेकींग, दक्ष ड्रायव्हिंग,मोटारसायकलीची उत्तमप्रकारे निगा राखूनच अशा टूरवर जावे. हेल्मेट शक्यतो पूर्ण असावे,हाफ हेल्मेट वापरू नये. त्यामुळे वारा, धूळ- माती यापासून चांगले संरक्षण मिळते. चष्मा असला तर गॉगल ग्लास हेल्मेटला लावली असेल तर ती गडद असू नये. शक्यतो तशी हेल्मेट्स ही गॉगल ग्लासपेक्षा साध्या पारदर्शक पांढऱ्या रंगाची असावी. त्यापेक्षा गॉगल असेल तर चांगले. मोटारसायकल पूर्ण नीट सर्व्हिस करून, ब्रेक, हेडलँप, ब्रेकलाईट, साईड इंडिकेटर हे व्यवस्थित आहेत की नाही ते पाहाणे. शक्यतो रात्रीचा प्रवास नकोच, हे ध्यानात घेऊन प्रवासाला निघावे. म्हणजे रात्री पोहोचणार असाल तर सायंकाळी कुठे तरी मुक्काम करावा. लांबच्या प्रवासात आपली कपॅसिटी अजमावू नये. टायरमधील हवा मधे मधेही चेक करावी. रस्त्याला दुभाजक असोत की नसोत, हेडलँप चालू ठेवलेला उत्तम असतो,सकाळच्यावेळीही तो सिग्नल म्हणून महत्त्वाचा आहे.

प्रत्यक्ष रस्त्यावर लांबच्या प्रवासात मोटारसायकल चालवणे व शहरात नेहमीच्या रस्त्यावर चालवणे यात फरक आहे. यासाठी वेगावर नियंत्रण, गीयरवर नियंत्रण व ब्रेक्सचा संतुलीत वापर गरजेचा आहे. वळणे, खड्डे, गतिअवरोधक याचबरोबर ग्रामीण भागातील वाहतुकीची स्थिती याचा पूर्ण अंदाज घेत ड्रायव्हिंग करावे. आपल्याबरोबर अति सामान घेऊ नये.आपल्याला आपण जपावे व दुसऱ्याच्याही कारण ग्रामीण भागात गायी, म्हशी, बैल, कुत्रे,गाढवे, डुक्कर असे प्राणी रस्त्यात कसे फिरतील याचा नेम नसतो. तसेच तेथी माणसे ही देखील त्यांच्या पद्धतीने वावरत असतात. गावातून जाताना आपले वर्तन विशेष करून वाहनचालन हे अतिशय दक्ष, सावध व सुरक्षित ठेवावे. सुरक्षित वाहनचालन व प्रवास हेच सर्वात महत्त्वाचे आहे. तरुणांमध्ये असणारा उत्साह हा कितीही असला तरी अशा प्रवासामध्ये संयम हेच मोठे सक्षमतेचे लक्षण असते.