शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

झेडपीच्या शिलेदारांचा वाहनांसाठी अट्टाहास

By admin | Updated: June 18, 2015 00:18 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या नव्या शिलेदारांना आता नवीन कोऱ्या वाहनाचे वेध लागले

आडकाठी : शासन नियम ठरत आहे अडचणीचेअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या नव्या शिलेदारांना आता नवीन कोऱ्या वाहनाचे वेध लागले असून वाहन खरेदीसाठी प्रशासनाकडे अट्टाहास केला जात आहे. मात्र अपेक्षा पूर्तीत वाहन बदलविण्यासाठी शासनाने लादलेली नियमावली आडकाठी ठरत असल्याने पदाधिकारी चांगलेच हतबल झाले आहेत.जिल्हा परिषदेत सत्तेत आल्यावर पदाधिकारी म्हणून खुर्चीवर बसणाऱ्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढत असतात. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सोई सुविधा परिपूर्ण रित्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात. जिल्हा परिषदेत सद्या सत्तेच्या सिंहासनावर कॉग्रेसची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधा व्यवस्थीत मिळाव्यात, यासाठी नियम ठरविले आहेत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला शासनाने सन २०११ मध्ये नवीन शासकीय वाहने उपलब्ध करून दिलीत. मात्र ही वाहने अल्पावधीत भंगार झाली आहेत. परिणामी दौऱ्यावर जाणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची चाके अचानक थांबल्याचेही किस्से घडले आहेत. पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात आलेल्या वाहनाचे निर्लेखन करताना त्यांच्याकडील वाहन हे किमान दहा वर्षे चाललेले असावे अथवा २ लाख ४० हजार किलोमिटर फिरलेले असणे आवश्यक आहे.याशिवाय वरील अटी पूर्ण करण्यापूवीर्च एखाद्या वाहनाचा अपघात, मोठी दुरूस्ती अशा कारणामुळे निरूउपयोगी ठरवायचे झाल्यास कार्यकारी अभियंता, यांत्रीकी विभाग किंवा महाराष्ट्र परिवहन सेवा यांच्याकडून वाहन दुरूस्ती करून उपयोगात आणणे आर्थीकदृष्टया लाभदायक राहणार नाही, असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच हे वाहन निरूउपयोगी ठरविण्यात येते त्यानंतरच नवीन वाहनाचा खरेदीचा विचार होऊ शकतो. मात्र यापैकी एकही पुर्तता विद्यमान पदाधिकाऱ्यांची वाहने करू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत वाहन खरेदीसाठी असलेल्या घसारा निधीतील आर्थिक तरतूद खर्च करता येत नाही . परिणामी नवीन वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा वाहनांचा अट्टाहास खरच पूर्ण होईल किंवा नाही? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पदाधिकाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या वाहनांपैकी दोन वाहने भंगारात जमा आहे. त्यामुळे ही वाहने निर्लेखनास पात्र ठरतात. बांधकाम, समाजकल्याण, महिला बाल कल्याण या तीन समितीच्या पदाधिकाऱ्यांची वाहने भगार झाली आहेत. त्यामुळे नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविल्याचे गिरीश कराळे यांनी सांगितले.