शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

झेडपीच्या शिलेदारांचा वाहनांसाठी अट्टाहास

By admin | Updated: June 18, 2015 00:18 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या नव्या शिलेदारांना आता नवीन कोऱ्या वाहनाचे वेध लागले

आडकाठी : शासन नियम ठरत आहे अडचणीचेअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या नव्या शिलेदारांना आता नवीन कोऱ्या वाहनाचे वेध लागले असून वाहन खरेदीसाठी प्रशासनाकडे अट्टाहास केला जात आहे. मात्र अपेक्षा पूर्तीत वाहन बदलविण्यासाठी शासनाने लादलेली नियमावली आडकाठी ठरत असल्याने पदाधिकारी चांगलेच हतबल झाले आहेत.जिल्हा परिषदेत सत्तेत आल्यावर पदाधिकारी म्हणून खुर्चीवर बसणाऱ्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढत असतात. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सोई सुविधा परिपूर्ण रित्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात. जिल्हा परिषदेत सद्या सत्तेच्या सिंहासनावर कॉग्रेसची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधा व्यवस्थीत मिळाव्यात, यासाठी नियम ठरविले आहेत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला शासनाने सन २०११ मध्ये नवीन शासकीय वाहने उपलब्ध करून दिलीत. मात्र ही वाहने अल्पावधीत भंगार झाली आहेत. परिणामी दौऱ्यावर जाणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची चाके अचानक थांबल्याचेही किस्से घडले आहेत. पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात आलेल्या वाहनाचे निर्लेखन करताना त्यांच्याकडील वाहन हे किमान दहा वर्षे चाललेले असावे अथवा २ लाख ४० हजार किलोमिटर फिरलेले असणे आवश्यक आहे.याशिवाय वरील अटी पूर्ण करण्यापूवीर्च एखाद्या वाहनाचा अपघात, मोठी दुरूस्ती अशा कारणामुळे निरूउपयोगी ठरवायचे झाल्यास कार्यकारी अभियंता, यांत्रीकी विभाग किंवा महाराष्ट्र परिवहन सेवा यांच्याकडून वाहन दुरूस्ती करून उपयोगात आणणे आर्थीकदृष्टया लाभदायक राहणार नाही, असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच हे वाहन निरूउपयोगी ठरविण्यात येते त्यानंतरच नवीन वाहनाचा खरेदीचा विचार होऊ शकतो. मात्र यापैकी एकही पुर्तता विद्यमान पदाधिकाऱ्यांची वाहने करू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत वाहन खरेदीसाठी असलेल्या घसारा निधीतील आर्थिक तरतूद खर्च करता येत नाही . परिणामी नवीन वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा वाहनांचा अट्टाहास खरच पूर्ण होईल किंवा नाही? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पदाधिकाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या वाहनांपैकी दोन वाहने भंगारात जमा आहे. त्यामुळे ही वाहने निर्लेखनास पात्र ठरतात. बांधकाम, समाजकल्याण, महिला बाल कल्याण या तीन समितीच्या पदाधिकाऱ्यांची वाहने भगार झाली आहेत. त्यामुळे नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविल्याचे गिरीश कराळे यांनी सांगितले.