शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

झेडपीतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:22 IST

जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी अभद्र युतीची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येत आहे.

ठळक मुद्देसत्तेसाठी व्यूहरचना : महाआघाडी एकत्र येणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी अभद्र युतीची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना येत्या काळात गती येणार आहे. परिणामी झेडपीत काँग्रेसला सत्ता कायम ठेवण्याच्या आव्हानाला समोरे जावे लागणार आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता झेडपीतील सत्तेसाठी महाआघाडी एकत्र येणार की जैसे थे राहणार याबाबत विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहे.लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये चुरशीच्या लढतीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या अपक्ष उमेदवारांना विजय खेचून आणला आहे. त्यामुळे सध्या महाआघाडीची बाजू मजबूत झाली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत सध्या काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधात निकाल आला आहे. काँग्रेससाठी हा निकाल नवसंजवनी ठरला आहे. जिल्हा परिषदेत ५९ सदस्यांमध्ये काँग्रेसचे २६, शिवसेना ३, भाजप १३, बसपा १, प्रहार १, राष्ट्रवादी काँग्रेस ५, रिपाइं १, लढा, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्ष असे १ सदस्य आहेत. युवा स्वाभिमानचे २ याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये सध्या सत्तेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं मिळून सत्ता आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवा स्वाभिमान अशी महाआघाडी निवडणूक रिंगणात होती. दुसरीकडे शिवसेना, भाजप, रिपाइं आठवले गट मिळून महायुतीने ही निवडणूक लढविली. लोकसभा निवडणुकीत महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.निवडणूक की मुदतवाढ?जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कालावधी येत्या २० सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षांसाठी निवडणुका होणार की विद्यमान पदाधिकाºयांना विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळेल याबाबत अद्यापही संभ्रम आहे. परिणामी आता निवडणुका होतील की, मुदतवाढ मिळेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.