शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

झेडपीतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:22 IST

जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी अभद्र युतीची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येत आहे.

ठळक मुद्देसत्तेसाठी व्यूहरचना : महाआघाडी एकत्र येणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी अभद्र युतीची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना येत्या काळात गती येणार आहे. परिणामी झेडपीत काँग्रेसला सत्ता कायम ठेवण्याच्या आव्हानाला समोरे जावे लागणार आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता झेडपीतील सत्तेसाठी महाआघाडी एकत्र येणार की जैसे थे राहणार याबाबत विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहे.लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये चुरशीच्या लढतीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या अपक्ष उमेदवारांना विजय खेचून आणला आहे. त्यामुळे सध्या महाआघाडीची बाजू मजबूत झाली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत सध्या काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधात निकाल आला आहे. काँग्रेससाठी हा निकाल नवसंजवनी ठरला आहे. जिल्हा परिषदेत ५९ सदस्यांमध्ये काँग्रेसचे २६, शिवसेना ३, भाजप १३, बसपा १, प्रहार १, राष्ट्रवादी काँग्रेस ५, रिपाइं १, लढा, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्ष असे १ सदस्य आहेत. युवा स्वाभिमानचे २ याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये सध्या सत्तेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं मिळून सत्ता आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवा स्वाभिमान अशी महाआघाडी निवडणूक रिंगणात होती. दुसरीकडे शिवसेना, भाजप, रिपाइं आठवले गट मिळून महायुतीने ही निवडणूक लढविली. लोकसभा निवडणुकीत महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.निवडणूक की मुदतवाढ?जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कालावधी येत्या २० सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षांसाठी निवडणुका होणार की विद्यमान पदाधिकाºयांना विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळेल याबाबत अद्यापही संभ्रम आहे. परिणामी आता निवडणुका होतील की, मुदतवाढ मिळेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.