शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी अध्यक्षांच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:10 IST

पांदण रस्त्याची न झालेली कामे, अनेक योजनांचा परत गेलेला निधी आणि भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू या घटनांना जिल्हा परिषदेचे निष्क्रिय पदाधिकारी कारणीभूत असल्याचा रोष व्यक्त करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे सोमवारी जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देबरखास्तीची मागणी : रिकाम्या खुर्चीला घातला हार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पांदण रस्त्याची न झालेली कामे, अनेक योजनांचा परत गेलेला निधी आणि भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू या घटनांना जिल्हा परिषदेचे निष्क्रिय पदाधिकारी कारणीभूत असल्याचा रोष व्यक्त करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे सोमवारी जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात त्यांच्या अनुपस्थितीत खुर्चीला हार घालण्यात आला. या आंदोलनात भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद दिसून आला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला हार घातल्यानंतर अध्यक्षांच्या दालनात लागलेल्या छायाचित्रांकडे मोर्चा वळविला. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व आमदार वीरेंद्र जगताप यांची छायाचित्रे दालनात आहेत; विद्यमान राष्ट्रपती, पंतप्रधान यांची का नाहीत, असा सवाल करीत भाजप कार्यकर्त्यांनी सदर छायाचित्रे भिंतीवरून काढली आणि तेथे उपस्थित कर्मचाºयाच्या स्वाधीन केले. प्रारंभी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे गटनेता प्रवीण तायडे, जयंत आमले यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या दालनात धडक दिली. जिल्हा परिषदेला शासनाकडून पांदण रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, त्याचा वापर कुठेही झाला नाही. आरोग्य केंद्रांची अवस्था शोचनीय झाली आहे. जनसुविधेचा पाच कोटींचा निधी अध्यक्षांनी न्यायालयात धाव घेतल्याने परत गेला. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या बैठकी आमदारांच्या घरी होतात आदी मुद्दे भाजपने सीईओंना दिलेल्या निवेदनात मांडले. रवींद्र मुंदे यांनी सत्ताधाºयांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामे रखडल्याचा आरोप केला. आंदोलनात प्रवीण तायडे, तात्या मेश्राम, जयंत आमले, मिलिंद बांबल, नितीन पटेल, विजय काळमेघ, साहेबराव काठोळे, विजय मेंढे, अनिल कुंडलवार, सुनील गवळी आदी सहभागी झाले होते.दरम्यान, भाजपच्या आंदोलनाची वार्ता कळताच युवक काँग्रेसने जिल्हा परिषदेत धाव घेतली. मात्र, तोपर्यंत भाजप कार्यकर्ते जिल्हा परिषदेतून निघून गेले होते.झेडपी बरखास्त करून दाखवाच; वीरेंद्र जगताप यांचे आव्हानराज्यात भाजपची सत्ता आहे. त्यांनी काँग्रेसशासित जिल्हा परिषद बरखास्त करून दाखवाव्यात, असे प्रतिआव्हान आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिले. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असल्याने भाजप सदस्यांनी विरोधाच्या राजकारणातून ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकासाच्या कोट्यवधीच्या निधीस दीड वर्षांपासून डीपीसीची मंजुरी मिळू दिलेली नाही. परिणामी विकासकामांवर निधी खर्च करता आला नाही. आता मान्यता मिळाली, तर निधीच्या मुदतवाढीचा चेंडू शासनाच्या कोर्टात आहे. निधी कुणामुळे थांबवला हे जगजाहीर आहे, असे आ. जगताप म्हणाले.जिल्हा परिषदेतील भाजप पदाधिकाऱ्यांनीच शासनाच्या माध्यमातून विकासकामांत आडकाठी आणून विकासकामे अडचणीत आणली. ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ ही भाजपची कार्यशैली आहे. आंदोलनाला घाबरत नाही. सर्व निधी विकासकामांवर खर्च होईल.- बबलू देशमुखजिल्हाध्यक्ष, काँग्रेसजिल्हा नियोजन समितीने तत्कालीन पालकमंत्र्याच्या माध्यमातून कामे रोखली. पांदण रस्त्याचा जिल्हा परिषदेशी काडीचाही संबंध नाही. भाजप पदाधिकाऱ्यांना योजनांचा अभ्यास नाही. हे आंदोलन केवळ राजकीय स्टंट आहे.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषदजिल्हा परिषदेचा कारभार पदाधिकारी व नेत्यामुळे ढेपाळला. यामुळे विकासाचा निधी परत गेला आहे. जनविकासाप्रति उदासिन असलेल्या सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्यात यावे, यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत.- दिनेश सूर्यवंशीजिल्हाध्यक्ष, भाजप