शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

झेडपी विश्रामगृहात सदस्य - कर्मचाऱ्यांत जुंपली

By admin | Updated: July 27, 2016 00:10 IST

जिल्हा परिषदेच्या मालकीचे मालटेकडी जवळ विश्रामगूह आहे.

तक्रार : अध्यक्षांकडे सुरक्षेची मागणी, आरक्षणाविना मुक्कामअमरावती: जिल्हा परिषदेच्या मालकीचे मालटेकडी जवळ विश्रामगूह आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री मेळघाटातील जि.प. सदस्य सदाशिव खडके यांनी विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांशी वाहन पार्किंग व खोलीच्या कारणावरून वाद केल्याची तक्रार येथील कर्मचाऱ्यांची मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. जिल्हा परिषद सदस्य २५ जुलै रोजी रात्री विश्रामगृहात आले. काही वाहने पोर्चमध्ये उभी होती. ही वाहने हटवितांना वेळ लागल्याने सदस्यांनी अचानक कर्मचाऱ्यांना शिविगाळ सुरू केली. त्यांना खोली नसल्याने ते भडकले व कर्मचाऱ्यांशी वाद केल्याचे अध्यक्षांकडे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सततच्या जाचाला कंटाळून यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.विशेष म्हणजे या विश्रामगृहात आरक्षण न करताच बरेच सदस्य येऊन राहतात. त्यामुळे आरक्षणाशिवाय कक्ष देण्यात येऊ नये. सोबतच या ठिकाणी बाहेरील लोकांचा वाढलेला हैदोस व मद्यपींचा धुमाकूळ तत्काळ थांबविण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात बांधकाम विभागाशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन अध्यक्ष सतीश उईके यांनी कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी भारत हांडे, विठ्ठल भांड, शेख बशारत शेख करामत, गजानन देशमुख, गणेश वानखडे, मनोहर फुले, अनिल बरसैय्या आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही लागणारजिल्हा परिषद विश्रामगृहात वाढलेल्या मद्यापींचा हैदोस रोखण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. याशिवाय पोलीस संरक्षण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतले जाईल. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी सुचविले आहे.