शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

११ कोटींसाठी ‘झेडपी’ काकूळतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:55 IST

पाणीटंचाई आराखड्याप्रमाणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत सुमारे ११ कोटी १२ लाख ३० हजार रूपयांचे कामे पूर्ण केलीत. तथापि तो निधी पावसाळा संपत असतानाही न मिळाल्याने जिल्हा परिषद यंत्रणा काकूळतीला आली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : ग्रामपंचायतींचा निधीसाठी ससेमिरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीटंचाई आराखड्याप्रमाणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत सुमारे ११ कोटी १२ लाख ३० हजार रूपयांचे कामे पूर्ण केलीत. तथापि तो निधी पावसाळा संपत असतानाही न मिळाल्याने जिल्हा परिषद यंत्रणा काकूळतीला आली आहे.दुसरीकडे पाणी टंचाई निवारणार्थ केलेल्या कामांचा निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा विभागाकडे ससेमिरा लावला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आराखडा तयार केला जातो. त्यानुसार सन २०१७-१८ साठीचा आराखडा तयार करण्यात आला. त्यास जिल्हाप्रशासनाने मान्यताही दिली. आराखड्यानुसार, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीटंचाई निवारणार्थ १५.६३ कोटींची कामे पुर्ण केली. त्यात जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत ११ कोटी १२ लाख ३० हजार, तर मजीप्राने ४ कोटी ५१ लाखांची कामे जानेवारी ते ३० जूनदरम्यान पूर्ण केली. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणी टंचाई आराखड्यातील बहुतांश कामे ही ग्रामपंचायतींने केली आहेत. तर काही कामे कंत्राटदारांनी केले आहे. पाणी टंचाईचे कामे ३० जून पूर्ण झाली आहेत. मात्र आराखडा मंजूरी पासून तर अद्यापर्यत टंचाई आराखडयातील झेडपीला आवश्यक असलेल्या ११ कोटी १२ लाख ३० हजार रूपयांच्या निधीतील एक रूपयाही उपलब्ध झाला नसल्याचे सुत्रांनी सांगितले. परिणामी पाणी टंचाईचे कामे केलेल्या ग्रामपंचायती व कंत्राटदारांना देयके मिळविण्यासाठी दररोज पाणी पुरवठा विभागाकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. अशातच आता पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास उपाय योजना करण्यासाठी निधी नाही. तर दूसरीकडे मागील देयके न मिळाल्याने संभाव्य कामे करण्यास कुणीही पुढाकार घेणार नसल्याची चर्चा झेडपीत सुरू आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा रखडलेला निधी त्वरित देण्याची मागणी होत आहे.टंचाई आराखड्यातील ही कामे झाली पुर्णपाणी टंचाईच्या निवारण आराखडयातून जानेवारी ते जूनपर्यत विंधन विहीर,कुपनलिके ची २०८, नळ योजनांची विशेष दूरूस्ती करणे जिल्हा परिषदेकडील १०५, तात्पुरत्या पुरक नळ योजनेची ५० , टँकर व बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याची १३, खासगी विहीर अधिग्रहणाची १५३ व विहीर खोलीकरणाची २ या प्रमाणे कामे पूर्ण करण्यात आली. झेडपी व मजीप्रा मिळून ६०९ कामे पूर्ण केली आहेत.यापोटी १५.६३ कोटी रूपयांचा निधी आवश्यक आहे.यात झेडपीला ११ कोटी १२ लाख ३० हजार तर मजीप्राला ४ कोटी ५१ लाख रुपये उपलब्ध करुन द्यावे, यासाठीचा प्रस्ताव पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे.पाणी टंचाई आराखडयातील कामे ३० जूनपर्यत पूर्ण केली. त्यासाठी झेडपीने ११.१२ कोटींचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. त्यावर तुर्तास निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे टंचाईचे कामे करणाºया ग्रामपंचायती व इतरांना देयके अदा करता आली नाहीत.निधी उपलब्ध होताच देयके दिली जातील- राजेंद्र सावळकरकार्यकारी अभियंतापाणी पुरवठा विभाग, झेडपी