शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

जिल्हाबंदी कागदोपत्री; बिनधास्त दळणवळण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

फोटो पी ०४ तिवसा पान २ चे लिड तिवसा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ मे पर्यंत ...

फोटो पी ०४ तिवसा

पान २ चे लिड

तिवसा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ मे पर्यंत संचारबंदी वाढवली. आंतरजिल्हा प्रवेशावरही बंधन आणले. ई-पासशिवाय कोणालाही इतर जिल्ह्यातून ये-जा करण्यास बंदी घातली आहे. मात्र, तिवसा तालुक्यात ती बंदी निव्वळ कागदोपत्री दिसत आहे. कोण कुठून येत आहे, कोण कुठे जात आहे, याचा लेखाजोखा कुठल्याही यंत्रणेकडे नाही. बिनधास्त दळणवळण सुरू आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे तिवसा तालुका ‘हॉट स्पॉट’ बनला असतानाही प्रशासनासोबतच नागरिकांचा निष्काळजीपणा संकटात भर टाकणारा ठरला आहे.

जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा पोलिसांच्यावतीने वरखेड फाट्याजवळ बॅरिकेड लावण्यात आली. तेथे नाकाबंदी करीत पोलीस चौकीदेखील तैनात करण्यात आल. मात्र, आता ती पोलीस चौकी शोभेची वस्तू बनली आहे. तेथे केवळ बॅरिकेड शिल्लक आहेत. येथून सर्रासपणे वाहनांची ये-जा सुरू आहे. कोणत्याही प्रकारची तपासणी तेथे केले जात नाही.

राज्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक होत आहे. त्यामुळे संक्रमणाची साख‌ळी तोडण्यासाठी कठोर जिल्हाबंदी घालण्यात आली. यात केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात यावा, तर ई-पासशिवाय कोणालाही दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, हे केवळ कागदावर दिसून येत आहे. तिवसा पोलीस ठाण्याच्यावतीने लावण्यात आलेले चेक पोस्ट देखावा बनले आहेत. येथे एखादेवेळी पोलीस बसले असतात. मात्र, ते कोणालाही अडवत नाही. साधी विचारपूसदेखील करीत नाहीत. त्यांच्या निरुपद्रवीपणामुळे शासनादेशाला तिलांजली दिली गेली आहे.

बॉक्स

तिवसा हे गाव अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तालुका मुख्यालयाचे गाव आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हाबंदी असूनही येथून सुसाट वाहतूक सुरू असते. या मार्गावरील वाहने तिवसा येथे थांबतात. या थांबलेल्यापैकी कोण कोरोना पॉझिटिव्ह, हे कळायला मार्ग नाही. तपासणी नाक्यावर कुणाचीही अँटिजेन तपासणी केली जात नाही. जिल्ह्यात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर किंवा अँटिजेन अहवाल मागितला जात नाही.

या बातमीत दोन कोट येत आहेत.