शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

जिल्हा परिषद शाळांना २,४४५ अंगणवाड्या होणार लिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण भागातील २ हजार ४४५ अंगणवाड्या लगतच्या शाळांना आता लिंक करण्यात येणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार ...

अमरावती : ग्रामीण भागातील २ हजार ४४५ अंगणवाड्या लगतच्या शाळांना आता लिंक करण्यात येणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याचा उद्देश यामागे असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते. त्यामुळे अंगणवाडी दर्जेदार असायला पाहिजे. त्यासाठी अंगणवाडीमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. सध्याच्या स्थितीत अंगणवाडीची स्थिती चांगली असली तरी अनेक अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. काही तर काही ग्रामपंचायत, समाज मंदिर आदी ठिकाणी भरत आहेत. एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन अंगणवाडी या तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २४४५ अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली. दरम्या राज्य शासनाकडून प्राप्त आदेशानुसार येथील प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील माहितीचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी यावर निर्णय झाल्यानंतर शासनाच्या वतीने शाळांसाठी निधी देण्यात येतो याचा उपयोग अप्रत्यक्षपणे अंगणवाड्यानाही होणार आहे.

बॉक्स

पालकांना दुसरीकडे जाण्याची गरज नाही!

ग्रामीण भागात अंगणवाड्यांमध्ये पालक मुलांना टाळतात त्यानंतर मुलांना दूर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश द्यावा लागतो. यामुळे पालक खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

काही खासगी शाळांकडून या प्रकारचा फायदा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे ओढण्याची शाळांमध्ये अंगणवाडी असल्यास पालकांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही.

कोट

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार याबाबतची माहीती संकलित करून तसा अहवाला शासनाकडे सादर केला आहे.यावर पुढील निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल.यानंतर दिलेल्या सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल.

- एजाज खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक