शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

जिल्हा परिषद शाळेचा घंटा आता तरी वाजवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:17 IST

अमरावती : कोरोना नियम शिथिल झाल्याने अनेक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. बऱ्याच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्याही शून्यावर ...

अमरावती : कोरोना नियम शिथिल झाल्याने अनेक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. बऱ्याच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्याही शून्यावर आली आहे. त्यामुळे आता शासनाने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागातील गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शासनाने शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.

ग्रामीण भागातील गावे कोरोनामुक्त झालीत. मध्यंतरी कोरोनामुक्त भागात शाळा सुरू करण्याच्या शासनाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. विद्यार्थी घरी राहून आळशी झाले आहेत,तर त्यांच्यातील चिडचिडापणा वाढला आहे. बाहेर जाणे बंद असल्याने अनेक मुले लठ्ठ झाली आहेत. शाळा बंद असल्याने दिवसभर लहान मुलांचे काय करावे, असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. बाजारपेठा सण, उत्सवांना परवानगी दिली जाते. मग शिस्तीत चालणाऱ्या शाळांनाच कोरोनाची भीती का दर्शविली जात आहे, असे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरू न झाल्याने मुलांचे बौद्धिक नुकसान होत असल्याचे शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी शासनास पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोट

शाळेत ऑनलाईनसाठी शिक्षक उपस्थित राहात आहेत. त्यानुसार शाळा सुरू केल्यास चांगलेच होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत शिस्तीत शाळा चालतील. मुलांचे बौद्धिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

-राजेश सावरकर,

राज्य प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षक समिती