शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

जिल्हा परिषद गटांची होणार फेररचना

By admin | Updated: May 13, 2015 00:34 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे.

अमरावती : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे. त्यामुळे हा भाग जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळला जाऊन झेडपीचे गट व पंचायत समितीच्या गणांचीही फेररचना केली जाणार आहे. शहराचा दर्जा मिळालेली गावे वाढल्याने एकूण ग्रामीण लोकसंख्या कमी होऊन गट व गणांची संख्याही कमी होऊ शकते. जिल्ह्याच्या राजकारणावरही याचा परिणाम जाणवणार आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांचा समावेश आहे. यांची आर्थिक, राजकीय आदी सर्वच रचना बदलून जाणार आहे. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या साधारणपणे २० लाखांवर आहे. शहरी लोकसंख्या ८ लाखांवर आहे. चार नगरपंचायती नव्याने अस्तित्वात येणार असल्याने या लोकसंख्येच्या प्रमाणातही फरक पडणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचे निकष नव्याने ठरविण्यात येऊन गट व गणांची फेररचना होणे क्रमप्राप्त आहे. या रचनेत अनेक दिग्गजांचे गट रद्द होऊ शकतील. या गावातील मतांवर अवलंबून असणाऱ्यांना आता जिल्हा परिषदेच्या राजकारणातून काढतापाय घ्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात पंचायत समितीचे १३० व जिल्हा परिषदेचे ५९ गट आहेत. यातील काही ठिकाणच्या रचनेत बदल होणार असून नगरपंचायतीचे क्षेत्र वगळता उर्वरित भागांची फेररचना होऊन गट व गण कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना प्रामुख्याने विविध करांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी निधीही मिळत असतो. नव्याने पालिका व पंचायती होणाऱ्या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेचे नियंत्रण संपुष्टात येणार असल्याने उत्पन्न व निधीत घट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सध्याच्या एकूण महसूल कोट्यवधी रुपयांचा असून नगरपंचायतींमुळे या ठिकाणच्या महसुली उत्पन्नास मुकावे लागणार आहे. याचा जिल्हा परिषदेच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.