शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

जिल्हा परिषद गटांची होणार फेररचना

By admin | Updated: May 13, 2015 00:34 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे.

अमरावती : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे. त्यामुळे हा भाग जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळला जाऊन झेडपीचे गट व पंचायत समितीच्या गणांचीही फेररचना केली जाणार आहे. शहराचा दर्जा मिळालेली गावे वाढल्याने एकूण ग्रामीण लोकसंख्या कमी होऊन गट व गणांची संख्याही कमी होऊ शकते. जिल्ह्याच्या राजकारणावरही याचा परिणाम जाणवणार आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांचा समावेश आहे. यांची आर्थिक, राजकीय आदी सर्वच रचना बदलून जाणार आहे. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या साधारणपणे २० लाखांवर आहे. शहरी लोकसंख्या ८ लाखांवर आहे. चार नगरपंचायती नव्याने अस्तित्वात येणार असल्याने या लोकसंख्येच्या प्रमाणातही फरक पडणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचे निकष नव्याने ठरविण्यात येऊन गट व गणांची फेररचना होणे क्रमप्राप्त आहे. या रचनेत अनेक दिग्गजांचे गट रद्द होऊ शकतील. या गावातील मतांवर अवलंबून असणाऱ्यांना आता जिल्हा परिषदेच्या राजकारणातून काढतापाय घ्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात पंचायत समितीचे १३० व जिल्हा परिषदेचे ५९ गट आहेत. यातील काही ठिकाणच्या रचनेत बदल होणार असून नगरपंचायतीचे क्षेत्र वगळता उर्वरित भागांची फेररचना होऊन गट व गण कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना प्रामुख्याने विविध करांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी निधीही मिळत असतो. नव्याने पालिका व पंचायती होणाऱ्या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेचे नियंत्रण संपुष्टात येणार असल्याने उत्पन्न व निधीत घट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सध्याच्या एकूण महसूल कोट्यवधी रुपयांचा असून नगरपंचायतींमुळे या ठिकाणच्या महसुली उत्पन्नास मुकावे लागणार आहे. याचा जिल्हा परिषदेच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.