शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

जिल्हा परिषद गटांची होणार फेररचना

By admin | Updated: May 13, 2015 00:34 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे.

अमरावती : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे. त्यामुळे हा भाग जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळला जाऊन झेडपीचे गट व पंचायत समितीच्या गणांचीही फेररचना केली जाणार आहे. शहराचा दर्जा मिळालेली गावे वाढल्याने एकूण ग्रामीण लोकसंख्या कमी होऊन गट व गणांची संख्याही कमी होऊ शकते. जिल्ह्याच्या राजकारणावरही याचा परिणाम जाणवणार आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांचा समावेश आहे. यांची आर्थिक, राजकीय आदी सर्वच रचना बदलून जाणार आहे. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या साधारणपणे २० लाखांवर आहे. शहरी लोकसंख्या ८ लाखांवर आहे. चार नगरपंचायती नव्याने अस्तित्वात येणार असल्याने या लोकसंख्येच्या प्रमाणातही फरक पडणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचे निकष नव्याने ठरविण्यात येऊन गट व गणांची फेररचना होणे क्रमप्राप्त आहे. या रचनेत अनेक दिग्गजांचे गट रद्द होऊ शकतील. या गावातील मतांवर अवलंबून असणाऱ्यांना आता जिल्हा परिषदेच्या राजकारणातून काढतापाय घ्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात पंचायत समितीचे १३० व जिल्हा परिषदेचे ५९ गट आहेत. यातील काही ठिकाणच्या रचनेत बदल होणार असून नगरपंचायतीचे क्षेत्र वगळता उर्वरित भागांची फेररचना होऊन गट व गण कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना प्रामुख्याने विविध करांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी निधीही मिळत असतो. नव्याने पालिका व पंचायती होणाऱ्या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेचे नियंत्रण संपुष्टात येणार असल्याने उत्पन्न व निधीत घट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सध्याच्या एकूण महसूल कोट्यवधी रुपयांचा असून नगरपंचायतींमुळे या ठिकाणच्या महसुली उत्पन्नास मुकावे लागणार आहे. याचा जिल्हा परिषदेच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.