शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘झिरो बजेट’ शेती काळाची गरज!

By admin | Updated: March 11, 2016 00:16 IST

झिरो बजेट ही काळाची गरज असून यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सुभाष पाळेकर यांनी केले.

सुभाष पाळेकर : चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरवरुड : झिरो बजेट ही काळाची गरज असून यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सुभाष पाळेकर यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व 'झिरो बजेट' स्वाभिमानी संत्रा उत्पादक संघटनेच्या वतीने आयोजित चार दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ग्रामीण विकास व शेती विकास हा फक्त झीरो बजेट नैसर्गिक शेतीमधूनच होऊ शकतो, असेही ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीने ग्रामीण शेतीचा पायाच उद्ध्वस्त झाला आहे. जमीन नापीक झाली आहे. भूजल जवळपास नष्ट झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. खेड्यातून तरुण वर्ग शहरात पलायन करतो आहे. शेतकऱ्यांना शेती सोडून किंवा शेती विकून इतर व्यावसायिक मार्गाकडे नेण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु हा विकास शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा आहे. जीव, जमिन, पाणी, पर्यावरणाचा ऱ्हास करणारा सेंद्रीय शेतीचा अवलंब आहे. त्यामुळेच झीरो बजेट नैैसर्गिक शेती ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी या ‘झीरो बजेट’ नैैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शिबिरात राज्यातील ६०० चे वर शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी रमेश फिस्के, मनोज जवंजाळ, हरीश कानुगो, महेंद्र देशमुख, आकाश बेलसरे यांनी मार्गदर्शन केले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भुयार, युवराज बरडे,नीलेश आकोटकर, अतुल देशमुख, वासुदेव मानकर, प्रवीण कुबडे, राहुल चौैधरी, उमेश डबरासे, सतिश पाटणकर, ऋषीकेश राऊत आदींनी प्रयत्न केलेत.