शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

झीरो बॅलेन्सला बँकांचा ‘खो’

By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST

प्रत्येक नागरिक बॅँकेशी जोडला जावा म्हणून राष्ट्रीयीकृत बॅँकांसोबत नागरी सहकारी बँकांना झिरो बॅलन्सवर बचतखाते उघडून देण्याचे केंद्राचे धोरण आहे.

खरेदीदारांची लूट : बचत खात्यात रक्कम नसेल तर सर्व्हिस चार्जेस अमरावती : प्रत्येक नागरिक बॅँकेशी जोडला जावा म्हणून राष्ट्रीयीकृत बॅँकांसोबत नागरी सहकारी बँकांना झिरो बॅलन्सवर बचतखाते उघडून देण्याचे केंद्राचे धोरण आहे. सध्या मात्र ग्राहकांना खात्यात ५०० ते १५०० रूपयांपर्यंत किमान रक्कम असावी, अन्यथा खाते बंद केले जाईल, असे सांगण्यात येत असल्याने बँकांनीच झिरो बॅलेन्स उपक्रमाला ठेंगा दाखविला असून ग्राहकामंध्ये संताप व्यक्त होत आहे. विविध योजनेतील अनुदान नागरिकांच्या खात्यावर जमा व्हावे व गाव बॅँकिंग व्यवहाराने जोडले जावे म्हणून सर्व बॅँकांनी नागरिकांचे ‘झिरो बॅलेन्स’वर खाते उघडण्याचे धोरण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे बचतखाते उघडण्यात आले आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीयीकृत बॅँकासह नागरी सहकारी बँकांमधूनही प्रत्येक खातेदाराच्या नावावर किमान ५०० ते १५०० रुपये शिल्लक नसल्यास खाते बंद केले जाईल व रकमेतून सर्व्हीस चार्ज वसूल केला जाईल, असे संदेश पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात सेवाकर कपातीस देखील सुरुवात झाली आहे. हा सेवाकर १५ ते ७० रूपयांपर्यंत आहे. यामुळे सेवाकराच्या नावाखाली खातेदारांची लूट सुरु असल्याचे चित्र दिसते.ग्रामीण भागात दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजुरांनी शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बॅँक खाती उघडली आहेत. अगदीच तुटपुंजी रक्कम दररोजच्या रोजगारातून हाती येत असल्याने किमान बॅँक बॅलेन्सची रक्कम भरणे या कुटूंबांसाठी शक्य नाही. त्यामुळे त्यांची बॅँक खाती बंद होण्याची शक्यता आहे. अनुदानाचा लाभ कसा घ्यावा असे प्रश्नचिन्ह या कुटूंबांसमोर उभे ठाकले आहे. केंद्र शासनाने पंतप्रधान जनधन योजना, सुरक्षा योजना यांसह अनेक योजनांसाठी नागरिकांचे ‘झिरो बॅलेन्स’वर खाते उघडण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. मात्र, या खात्यातून ग्राहकांनी व्यवहार करावा, यासाठी बँकांद्वारा आता ग्राहकांनाच वेठीस धरले जात आहे. (प्रतिनिधी)पैसे अडकून पडणार अन्नसुरक्षा योजनेचे अनुदान घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे खाते उघडावे लागते. चार सदस्यांचे कुटुंब असेल तर हातावर पोट असणाऱ्या लोकांचे किमान दोन हजार रुपये केवळ बचत खात्यात अडकून पडणार आहेत. किमान बॅलेन्सची अट रद्द करुन पूर्वीप्रमाणे ‘झिरो बॅलेन्स बॅँकिंग’ व्यवहार सुरु राहावेत तसेच बॅँका खात्याच रक्कम ठेवण्याची मनमानी करीत असतील तर त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. बीपीएल खातेदार कसा करणार व्यवहार ?पंतप्रधान जनधन योजना, सुरक्षा योजनेसह अन्य योजनांसाठी सर्वसामान्य नागरिकांनी झिरो बॅलेन्सवर बँकांमध्ये खाते उघडले आहे. यासंदर्भात आवश्यक प्रिमियम त्यांनी भरला. मात्र, काही बँकाद्वारा खात्यात ५०० ते १५०० रुपये ठेवावे, असा आग्रह धरत असल्याने मोलमजुरी करणाऱ्यांनी खात्यामध्ये रक्कम कोठून भरावी व व्यवहार कसा करावा? हा प्रश्न निर्माण होत आहे. जनधन योजनेसाठी बँकांमध्ये खाते उघडले. परंतु बँकेद्वारा खात्यात किमान ५०० रुपये तरी ठेवावेत, अशी सूचना आहे. तसेच या संदर्भात बँकेचे संदेश देखील आले आहेत. अन्यथा सर्व्हिस चार्ज कापला जाईल, असे सांगण्यात आले. - शेख शमीम, खातेदारपंतप्रधान जनधन योजनेमधील ९० टक्के ग्राहकांचे खाते झिरो बॅलेन्सवर आहेत. रूपी कार्डद्वारा व्यवहार केल्यास ९० दिवसांपर्यंत २ ते ५ लाखापर्यंत विमा मिळू शकतो. योजनांचा उद्देश सफल व्हावा, यासाठी काही बँकांद्वारा ग्राहकांनी खात्यातून व्यवहार करावे, असे सांगीतले जात आहे. - सुनील रामटेके, व्यवस्थापक, अग्रणी बँक