शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गॉडफादरअभावी झेडपीला बुरे दिन !

By admin | Updated: April 23, 2015 00:03 IST

ग्रामीण विकासाचा मार्ग असलेल्या जिल्हा परिषदेत निधीअभावी आणि रिक्त पदे न भरल्यामुळे अनेक योजनांतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

निधीचा तुटवडा : ग्रामीण विभागाच्या विकासावर वाईट परिणामजितेंद्र दखणे अमरावतीग्रामीण विकासाचा मार्ग असलेल्या जिल्हा परिषदेत निधीअभावी आणि रिक्त पदे न भरल्यामुळे अनेक योजनांतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींचा मिळणारा निधी आता मात्र युतीची सत्ता आल्याने तोकड्या स्वरुपात मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटत चालला आहे.२५.१५ या ग्रामीण पायाभूत विकासासाठी सुविधा पुरविण्याचा योजनेमध्ये मागील वर्षी सुमारे ८ कोटी ४८ लक्ष निधी मिळाला होता. आता मात्र तीन कोटींवरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे योजना राबविताना पदाधिकारी अधिकाऱ्यांची गोची होत आहे. निधीचा ओघ आटतोयसत्तेत गॉडफादर नसल्याने मोठ्या योजनांचा लाभ जिल्हा परिषदेला मिळत नसल्यांची खंतही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मागील वर्षी ग्रामीण पायाभूत विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळाले होते. यंदा मात्र हा अडथडा बऱ्याच प्रमाणात घटला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असल्याने केंद्र व राज्यातील युतीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेत उल्लेखनीय योजना राबविताना सत्ताधाऱ्यांची कसरत होणार आहे. सत्तेचे छत्र हरपलेजिल्हा परिषदेत आतापर्यंतच्या इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळापासून राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता राहिली. मात्र मागील वर्षी देशात, राज्यात सत्तांतर झाल्याने सत्तेचे छत्र हरपले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री, अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हे झेडपीसाठी गॉडफादर ठरत असल्याने निधीचा अभाव जाणवत नव्हता. शिवाय त्याकाळी पालकमंत्रीसुद्धा आघाडीचे असल्याने निधी मिळवण्यात जिल्हा परिषद आघाडीवर होती.स्व: उत्पन्न अल्पआता जिल्हा परिषदेला गॉडफादरच राहिला नसल्याची खंत पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. झेडपीच्या स्वत:च्या जागा जास्त असल्या तरी त्या ग्रामीण भागात असल्याने त्यामधून उत्पन्न मिळविण्यास अडचणी येतात. शहर व जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी झेडपीच्या जागा आहेत. मात्र त्या विकसित केल्या नसल्याने स्व: उत्पन्न कमीच आहे. सध्या निधीसाठी ९५ टक्के केंद्र व राज्य शासनावरच अवलंबून रहावे लागत आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता नसली तरी शासनाच्या धोरणानुसार जो निधी मिळतो तो मिळणारच मात्र शेवटी जनतेचा विकास करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून जबाबदारी आहे. यादृष्टीने शासन जिल्हा परिषदेच्या विकास निधीसाठी सहकार्य करेलच. -सतीश उईके,अध्यक्ष, जिल्हा परिषद अमरावती.