शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

गॉडफादरअभावी झेडपीला बुरे दिन !

By admin | Updated: April 23, 2015 00:03 IST

ग्रामीण विकासाचा मार्ग असलेल्या जिल्हा परिषदेत निधीअभावी आणि रिक्त पदे न भरल्यामुळे अनेक योजनांतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

निधीचा तुटवडा : ग्रामीण विभागाच्या विकासावर वाईट परिणामजितेंद्र दखणे अमरावतीग्रामीण विकासाचा मार्ग असलेल्या जिल्हा परिषदेत निधीअभावी आणि रिक्त पदे न भरल्यामुळे अनेक योजनांतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींचा मिळणारा निधी आता मात्र युतीची सत्ता आल्याने तोकड्या स्वरुपात मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटत चालला आहे.२५.१५ या ग्रामीण पायाभूत विकासासाठी सुविधा पुरविण्याचा योजनेमध्ये मागील वर्षी सुमारे ८ कोटी ४८ लक्ष निधी मिळाला होता. आता मात्र तीन कोटींवरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे योजना राबविताना पदाधिकारी अधिकाऱ्यांची गोची होत आहे. निधीचा ओघ आटतोयसत्तेत गॉडफादर नसल्याने मोठ्या योजनांचा लाभ जिल्हा परिषदेला मिळत नसल्यांची खंतही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मागील वर्षी ग्रामीण पायाभूत विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळाले होते. यंदा मात्र हा अडथडा बऱ्याच प्रमाणात घटला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असल्याने केंद्र व राज्यातील युतीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेत उल्लेखनीय योजना राबविताना सत्ताधाऱ्यांची कसरत होणार आहे. सत्तेचे छत्र हरपलेजिल्हा परिषदेत आतापर्यंतच्या इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळापासून राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता राहिली. मात्र मागील वर्षी देशात, राज्यात सत्तांतर झाल्याने सत्तेचे छत्र हरपले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री, अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हे झेडपीसाठी गॉडफादर ठरत असल्याने निधीचा अभाव जाणवत नव्हता. शिवाय त्याकाळी पालकमंत्रीसुद्धा आघाडीचे असल्याने निधी मिळवण्यात जिल्हा परिषद आघाडीवर होती.स्व: उत्पन्न अल्पआता जिल्हा परिषदेला गॉडफादरच राहिला नसल्याची खंत पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. झेडपीच्या स्वत:च्या जागा जास्त असल्या तरी त्या ग्रामीण भागात असल्याने त्यामधून उत्पन्न मिळविण्यास अडचणी येतात. शहर व जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी झेडपीच्या जागा आहेत. मात्र त्या विकसित केल्या नसल्याने स्व: उत्पन्न कमीच आहे. सध्या निधीसाठी ९५ टक्के केंद्र व राज्य शासनावरच अवलंबून रहावे लागत आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता नसली तरी शासनाच्या धोरणानुसार जो निधी मिळतो तो मिळणारच मात्र शेवटी जनतेचा विकास करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून जबाबदारी आहे. यादृष्टीने शासन जिल्हा परिषदेच्या विकास निधीसाठी सहकार्य करेलच. -सतीश उईके,अध्यक्ष, जिल्हा परिषद अमरावती.