शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

युवकांनी शिवबांप्रमाणे चारित्र्यसंपन्न व्हावे

By admin | Updated: February 20, 2015 00:12 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आयुष्यात अनेक सकंटांना सामोरे गेले. त्यामुळेच त्यांना स्वराज्य मिळविण्यात यश आले.

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आयुष्यात अनेक सकंटांना सामोरे गेले. त्यामुळेच त्यांना स्वराज्य मिळविण्यात यश आले. आज परिस्थिती बदलली असली तरी समस्या मात्र त्याच आहेत. त्यातून बाहेर येण्याचा मार्गदेखील या समस्यांमध्येच दडला आहे. तो शोधता आला तर प्रत्येकजण शिवबांप्रमाणे नवे साम्राज्य स्थापन करु शकतील. विशेषत: युवकांनी शिवाजी महाराजांप्रमाणे चारित्र्य संपन्न होऊन समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या पृथ्वीवर अवतरीत झाले असे म्हणता येईल, असे विचार अकोल्याचे ख्यातिनाम प्रबोधक शिवश्री शिवाजी भोसले यांनी मांडले. स्थानीय मालटेकडी परिसरात गुरुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात महापौर चरणजीत कौर नंदा, आमदार सुनील देशमुख, संजय जाधव, जिजाऊ कमर्शियल को-अप बँकेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कोठाडे, माजी खासदार अनंत गुढे, अरविंद गावंडे, चंद्रकांत मोहिते, उज्ज्वल गावंडे, हरिभाऊ लुंगे, कांचनमाला उल्हे, किर्तीमाला चौधरी, राहुल पाटील ढोक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मालटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेंला माल्यार्पण केले.