शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

वीजबिल माफीसाठी युवा स्वाभिमानचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

मोर्चेकऱ्यांना गर्ल्स हायस्कूल चौकात रोखले, वाढीव देयकांची केली होळी अमरावती : लॉकडाऊनंतर वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या अवास्तव वीज ...

मोर्चेकऱ्यांना गर्ल्स हायस्कूल चौकात रोखले, वाढीव देयकांची केली होळी

अमरावती : लॉकडाऊनंतर वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या अवास्तव वीज बिलात ५० टक्के माफी देण्याच्या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला.नियोजनानुसार पालकमंत्र्यांच्या घरावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात थांबविला. त्यानंतर एक शिष्टमंडळ निवेदन देण्याकरिता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानपर्यंत पोहोचले.

२४ मार्च २०२० पासून देशभरात कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. या कालावधीत अनेकांचे रोजगार गेले. अनेकांच्या नोकरीवर गंडांतर आले. असे असताना नागरिकांना विजेची अव्वाच्या सव्वापट्टीने वीजबिले देण्यात आली. मात्र, शासनाने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्याचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहोचविण्यासाठी युवा स्वाभिमानने आमदार रवि राणा, खासदार नवनित राणा यांच्या मार्गदर्शनात वीज देयके माफीसाठी १३ फे्ब्रुवारी रोजी इर्विन चौकातून काढला.वीजबिल माफी झाली पाहिजे, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा आशयाचे फलक हातात घेऊन घोषणा देत महिला व पुरुषांसह युवा कार्यकर्ते पुढे मार्गस्थ झाले. गर्ल्स हायस्कूल चौकात पोलिसांनी बॅरिकेडिंग करून मोर्चेकऱ्यांना रोखले. पुढे जाण्यासाठी परवानगी नाही. १० जणांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यास पालकमंत्र्यांच्या घरी जाऊ शकता, असा प्रस्ताव पोलिसांनी दिला. पदाधिकाऱ्यांनी तो स्वीकारला. याच कालावधीत कार्यकर्त्यांनी नारेबाजी करीत वीज देयकांच्या झेराॅक्स प्रतिची होळी केली. पोलिसांच्या वाहनातूनच प्रमुख कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. पालकमंत्री मुंब्ईत असल्याने त्यांच्यावतीने ओएसडी प्रमोद कापडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसच्या दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, हरिभाऊ मोहोड, अनिकेत देशमुख आदींनी निवेदन स्वीकारले.

बॉक्स

न्याय देण्याची मागणी

आमच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी शासन दरबारी पोहोचवून न्याय द्यावा, अशी विनंती युवा स्वाभिमानच्यवतीने करण्यात आली. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दूधाने, संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, विनोद जायवाल, ज्याेती सैरिसे, विनोद गुहे, सुमती ढोके, आशिष गावंडे, सपना ठाकूर, मयुरी कावरे, मुकसुद, वर्षा पकडे, अभिजित देशमुख, पराग चिमोटे, अनिल मिश्रा, अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे, गणेश मारोडकर, रवि अडोकार व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.