शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकºयाने घेतले विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:03 IST

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.

ठळक मुद्देनोकरी सोडून केली शेती : विदर्भातील पहिलीच सेंद्रिय बाग

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली. दीड लाख रुपये महिन्याचा पगार सोडून शेती करण्यासाठी आलेल्या एका युवकाने पारंपरिक शेती करणाºया शेतकºयांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.तिवसा तालुक्यातील कुºहा येथील शेतकरी संजय देशमुख यांनी कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता संपूर्णत: नैसर्गिकरीत्या डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले.संजय देशमुख यांनी २०१४ साली तीन एकर जागेत दोन हजार डाळिंबाची लागवड केली. शंभर टक्के विषमुक्त डाळिंब उत्पादित करायचे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आॅगस्ट २०१७ मध्ये त्यांनी पहिला बार तोडला. त्यात ९ टन उत्पादन घेतले.कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता त्यांनी लावलेल्या झाडांवर ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंतचे एक-एक डाळिंब लागले आहे. यासाठी त्यांनी विविध शेतकरी तज्ज्ञांकडून वेळोवेळी सल्ले घेतले. नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर यांचे मार्गदर्शन मिळाले.त्यांची पुढची वाटचाल या परिसरातील तरुण मेहनती शेतकºयांना एकत्र करून विषमुक्त संत्रा, भाजीपाला, आणि शक्य होईल तेवढ्या शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यास मार्गदर्शन करणार आहेत.परदेशात फळांची मागणीविषमुक्त डाळिंबास युरोपात सर्वाधिक मागणी आहे. यामुळे त्यांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली. यात त्यांना पूर्णपणे यश मिळाले असून पहिल्याच बहरात त्यांना संपूर्ण विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन घेता आले आहे. विशेष म्हणजे त्यांची डाळिंबाची बाग विदर्भातील पहिली सेंद्रिय व विषमुक्त फळबाग आहे. युरोपियन युनियनच्या निकषावर त्यांच्या बागेतील फळे विषमुक्त ठरली आहेत.पारंपरिक शेती सोडून सेंद्रिय शेती ही काळाची गरज झाली आहे. विषमुक्त धान्य, फळे भाजीपाला पिकविण्याला प्राधान्य देण्यासाठी शेतकºयांसह शासनानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. सेंद्रिय शेतीसाठी विदर्भातील शेतकºयांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.- संजय देशमुख,विषमुक्त डाळिंब उत्पादक