शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकºयाने घेतले विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:03 IST

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.

ठळक मुद्देनोकरी सोडून केली शेती : विदर्भातील पहिलीच सेंद्रिय बाग

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली. दीड लाख रुपये महिन्याचा पगार सोडून शेती करण्यासाठी आलेल्या एका युवकाने पारंपरिक शेती करणाºया शेतकºयांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.तिवसा तालुक्यातील कुºहा येथील शेतकरी संजय देशमुख यांनी कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता संपूर्णत: नैसर्गिकरीत्या डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले.संजय देशमुख यांनी २०१४ साली तीन एकर जागेत दोन हजार डाळिंबाची लागवड केली. शंभर टक्के विषमुक्त डाळिंब उत्पादित करायचे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आॅगस्ट २०१७ मध्ये त्यांनी पहिला बार तोडला. त्यात ९ टन उत्पादन घेतले.कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता त्यांनी लावलेल्या झाडांवर ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंतचे एक-एक डाळिंब लागले आहे. यासाठी त्यांनी विविध शेतकरी तज्ज्ञांकडून वेळोवेळी सल्ले घेतले. नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर यांचे मार्गदर्शन मिळाले.त्यांची पुढची वाटचाल या परिसरातील तरुण मेहनती शेतकºयांना एकत्र करून विषमुक्त संत्रा, भाजीपाला, आणि शक्य होईल तेवढ्या शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यास मार्गदर्शन करणार आहेत.परदेशात फळांची मागणीविषमुक्त डाळिंबास युरोपात सर्वाधिक मागणी आहे. यामुळे त्यांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली. यात त्यांना पूर्णपणे यश मिळाले असून पहिल्याच बहरात त्यांना संपूर्ण विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन घेता आले आहे. विशेष म्हणजे त्यांची डाळिंबाची बाग विदर्भातील पहिली सेंद्रिय व विषमुक्त फळबाग आहे. युरोपियन युनियनच्या निकषावर त्यांच्या बागेतील फळे विषमुक्त ठरली आहेत.पारंपरिक शेती सोडून सेंद्रिय शेती ही काळाची गरज झाली आहे. विषमुक्त धान्य, फळे भाजीपाला पिकविण्याला प्राधान्य देण्यासाठी शेतकºयांसह शासनानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. सेंद्रिय शेतीसाठी विदर्भातील शेतकºयांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.- संजय देशमुख,विषमुक्त डाळिंब उत्पादक