शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

'येलो मोझॅक'चे व्यवस्थापन गरजेचे

By admin | Updated: July 6, 2016 00:41 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

औरंगाबाद : दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी पावसामुळे मोठ मोठी झाडे उन्मळून पडली, तसेच अनेक भागात रस्त्यांवर तळे साचले. त्यामुळे तेथील वाहतूक मंदावली. शहरात तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत होता. मात्र मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील सर्वच भागात दुपारी १२ वाजेपासून संततधार पाऊस सुरू झाला. सायंकाळपर्यंत चाललेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विशेषत: दुपारचे शाळकरी विद्यार्थी, खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक यांना अडचणीचा सामना करावा लागता. शहरातील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जालना रोडवर क्रांतीचौक, दूध डेअरी, हायकोर्ट आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. औरंगपुरा, टीव्ही सेंटर चौक, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील कार्तिकी हॉटेल, सिडकोतील भगवानबाबा होमिओपॅथिक कॉलेज जवळचा रस्ता, जवाहर कॉलनी, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन परिसर, चिकलठाणा, सातारा परिसर या भागातील रस्त्यांंनाही तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक मंदावली होती. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अविश्रांतपणे हा पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो सुरू राहिला. या दमदार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शहरातील नाले ओसंडून वाहिले. बारुदगरनाला, औरंगपुऱ्यातील नाला दुथडी भरून वाहत होता. शहरात १ जूनपासून आतापर्यंत बऱ्याच वेळा पाऊस झाला. मात्र आज झालेला पाऊस हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा पाऊस ठरला. ४मंगळवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेदरम्यान तब्बल ६६.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. शासकीय निकषानुसार दिवसभरात ६५ मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी समजली जाते. याआधी शनिवारी १० मि. मी., रविवारी ८.६ मि. मी. आणि सोमवारी ५ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. मुथियान कॉर्नर परिसरात पाणीच पाणी क्रांतीचौक प्रभागातील मुथियान कार्नर येथील कोहिनूर गार्डन व त्या मागील वसाहतीत पावसामुळे पाणी शिरले होते. नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला बोलावून घेतले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी पाणी काढण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी पंकज वाडकर यांच्यासह नागरिकांनी मदत केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षित भिंतीला लागून असलेले एक मोठे झाड सायंकाळी मुळासकट उन्मळून खाली पडले. मात्र यामुळे काहीही हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला.