शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोयाबीनची सर्वाधिक पेरणी

By admin | Updated: July 12, 2015 00:22 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

कपाशीला पर्याय : मूग, उडदाचेही क्षेत्र होणार रुपांतरितअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी ५ लाख ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात ९ जुलै अखेर पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. हे क्षेत्र कपाशी पेक्षा १ लाख २ हजार ६०१ हेक्टरने जास्त आहे. पावसाच्याव प्रदीर्घ खंडामुळे मूग, उडीदाचेही क्षेत्र सोयाबीनमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनचे क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक वाढणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे २ लाख ९३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ८९ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टर, चिखलदरा ११ हजार ८१० हेक्टर, अमरावती ३१ हजार २१० हेक्टर, भातकुली २९ हजार ७०८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३८ हजार ३३० हेक्टर, चांदूररेल्वे १९ हजार हेक्टर, तिवसा २२ हजार ८८६ हेक्टर, मोर्शी १९ हजार २१२ हेक्टर, वरुड ८५० हेक्टर, दर्यापूर १४ हजार ७७२ हेक्टर, अंजनगाव सूर्जी १३ हजार ४२४ हेक्टर, अचलपूर १० हजार ४०९ हेक्टर, चांदूरबाजार १७ हजार ३२३ हेक्टर, धामणगाव रेल्वे २२ हजार ७१७ हेक्टर अशा एकूण २ लाख ६० हजार ४०१ हेक्टरवर पेरणी झाली. खरीप हंगामात पेरणीच्या पहिल्या टप्प्यात सोयाबीनपेक्षा कपाशी वाणाची अधिक पेरणी झाली होती. मात्र नंतर सोयाबीन पेरणीचा वेग वाढला. सद्यस्थितीत कपाशीपेक्षा सोयाबीन १ लाख हेक्टरने अधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात कपाशीचे १ लाख ५७ हजार ७० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ६ हजार २१०, चिखलदरा ५४४ हेक्टर, अमरावती ७ हजार ५४२ हेक्टर, भातकुली ५ हजार १७८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ४ हजार ११७ हेक्टर, चांदूररेल्वे ४ हजार ६३३ हेक्टर, वरुड २६ हजार हेक्टर, दर्यापूर १८ हजार ५८९ हेक्टर, अंजनगाव १० हजार ६१ हेक्टर, अचलपूर १३ हजार ५२० हेक्टर, चांदूरबाजार १४ हजार ९२७ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १८ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. (प्रतिनिधी)सोयाबीनच्या क्षेत्रात होणार वाढ यावर्षीच्या हंगामात पावसात प्रदीर्घ खंड आहे. १७ दिवसांपासून पाऊ स बेपत्ता आहे. आणखी ५ ते ७ दिवस दमदार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ६० दिवस अल्पकालावधीचे मूग व उडीद पिके बाद होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र कपाशीमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनची पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात होणार असल्याची माहिती आहे. वरुड तालुक्यात सर्वात कमी सोयाबीन पीकसद्यस्थितीत वरुड तालुक्यात फक्त ८५० हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची पेरणी वरुड तालुक्यात २६ हजार हेक्टरमध्ये झाली आहे. तर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३८ हजार ३३० हेक्टरमध्ये झाली आहे.