शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

यंदा सोयाबीनची सर्वाधिक पेरणी

By admin | Updated: July 12, 2015 00:22 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

कपाशीला पर्याय : मूग, उडदाचेही क्षेत्र होणार रुपांतरितअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी ५ लाख ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात ९ जुलै अखेर पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. हे क्षेत्र कपाशी पेक्षा १ लाख २ हजार ६०१ हेक्टरने जास्त आहे. पावसाच्याव प्रदीर्घ खंडामुळे मूग, उडीदाचेही क्षेत्र सोयाबीनमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनचे क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक वाढणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे २ लाख ९३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ८९ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टर, चिखलदरा ११ हजार ८१० हेक्टर, अमरावती ३१ हजार २१० हेक्टर, भातकुली २९ हजार ७०८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३८ हजार ३३० हेक्टर, चांदूररेल्वे १९ हजार हेक्टर, तिवसा २२ हजार ८८६ हेक्टर, मोर्शी १९ हजार २१२ हेक्टर, वरुड ८५० हेक्टर, दर्यापूर १४ हजार ७७२ हेक्टर, अंजनगाव सूर्जी १३ हजार ४२४ हेक्टर, अचलपूर १० हजार ४०९ हेक्टर, चांदूरबाजार १७ हजार ३२३ हेक्टर, धामणगाव रेल्वे २२ हजार ७१७ हेक्टर अशा एकूण २ लाख ६० हजार ४०१ हेक्टरवर पेरणी झाली. खरीप हंगामात पेरणीच्या पहिल्या टप्प्यात सोयाबीनपेक्षा कपाशी वाणाची अधिक पेरणी झाली होती. मात्र नंतर सोयाबीन पेरणीचा वेग वाढला. सद्यस्थितीत कपाशीपेक्षा सोयाबीन १ लाख हेक्टरने अधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात कपाशीचे १ लाख ५७ हजार ७० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ६ हजार २१०, चिखलदरा ५४४ हेक्टर, अमरावती ७ हजार ५४२ हेक्टर, भातकुली ५ हजार १७८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ४ हजार ११७ हेक्टर, चांदूररेल्वे ४ हजार ६३३ हेक्टर, वरुड २६ हजार हेक्टर, दर्यापूर १८ हजार ५८९ हेक्टर, अंजनगाव १० हजार ६१ हेक्टर, अचलपूर १३ हजार ५२० हेक्टर, चांदूरबाजार १४ हजार ९२७ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १८ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. (प्रतिनिधी)सोयाबीनच्या क्षेत्रात होणार वाढ यावर्षीच्या हंगामात पावसात प्रदीर्घ खंड आहे. १७ दिवसांपासून पाऊ स बेपत्ता आहे. आणखी ५ ते ७ दिवस दमदार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ६० दिवस अल्पकालावधीचे मूग व उडीद पिके बाद होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र कपाशीमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनची पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात होणार असल्याची माहिती आहे. वरुड तालुक्यात सर्वात कमी सोयाबीन पीकसद्यस्थितीत वरुड तालुक्यात फक्त ८५० हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची पेरणी वरुड तालुक्यात २६ हजार हेक्टरमध्ये झाली आहे. तर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३८ हजार ३३० हेक्टरमध्ये झाली आहे.