शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

यंदा शेती ठेका-बटईने देण्याकडे अनेकांचा कल

By admin | Updated: March 11, 2015 00:32 IST

मागील दोन, तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरूच आहे. अर्धाही उत्पादन खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. निव्वळ शेतीवर विसंबून राहणे अशक्यप्राय आहे.

लोकमत विशेषअमरावती : मागील दोन, तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरूच आहे. अर्धाही उत्पादन खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. निव्वळ शेतीवर विसंबून राहणे अशक्यप्राय आहे. पुढील हंगामात पेरणी कशी करावी ही समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी बैल-बारदाना मोडीत काढला आहे. यंदा पैशाच्या स्वरुपात किंवा भागिदारीत शेती देण्याकडे कल दिसून येत आहे.जिल्ह्यात पेरणीयोग्य १० लाख हेक्टर क्षेत्र आहे. संरक्षित सिंचनाची सोय असलेले १० टक्के क्षेत्र वगळता उर्वरित ९० टक्के क्षेत्र पावसावर अवलंबून असते. मागील वर्षी सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पावसामुळे खरीप हंगाम गारद झाला. सर्वाधिक पेरणी क्षेत्र असणारे सोयाबीन खराब झाले. परतीच्या पावसामुळे व जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात आलेल्या गारपिटीमुळे सर्वच पिके बाधित झालीत. परिणामी उत्पादन खर्चदेखील निघाला नाही.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत खरिपाची पेरणी सुरू होती. नंतर पावसात खंड यामुळे सोयाबीनची क्विंटलऐवजी किलोची झडती आली. काही शेतातील सोयाबीन शेतातच सडले. सोयाबीनच्या उत्पन्नात ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत घट झाली. उत्पादन खर्च निघणे दूरच, पेरणी खर्चदेखील निघू शकला नाही. सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. शेती पिकाची अवस्था काहीही असो घरगड्यांचा वार्षिक पगार हा लाखांच्या घरात पोहोचला आहे. मजुरीचे दर वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून भाड्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)सालकरी पोहोचला  एक लाखावरअक्षयतृतीयेनंतर सालकरी ठेवण्याची प्रथा आहे. जिल्ह्यात सालकऱ्याचे ७० ते ७५ हजार रूपये वर्ष असे करार असतात. याव्यतिरिक्त दिवाळी, पोळ्याला ड्रेस, धान्य हे वेगळेच आहे. हल्ली संपर्कासाठी मोबाईल देखील द्यावा लागतो. त्यामुळे हा सालकरी आता लाखावर पोहचला आहे. उत्पन्न कमी होत असल्याने अनेक मोठ्या खटल्यातून सालकरी बाद होऊन रोजंदारीवर कामे करीत आहेत. शेतीच्या प्रतवारीवर ठरतो भावशेती पैशाने, मक्त्याने किंवा भागिदारीत लावायची असल्यास त्या शेताची प्रतवारी पाहून भाव ठरतो. साधारणपणे जिल्ह्यात १० ते २५ हजार रूपये एकर असे भाव आहे. भागिदारीत दिली असल्यास प्रत्येक खर्च हा अर्धा विभागला जातो. एक हंगाम किंवा दोन्ही हंगामासाठी शेती दिली जाते. १८ हजारांनी घटली बैलांची संख्याजिल्ह्यात २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. यामध्ये २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेच्या तुलनेत बैलांची संख्या १८ हजारांनी कमी झाली आहे. यांत्रिककरण व नापिकीमुळे दोन वर्षांत ५ हजार बैलांची संख्या कमी झाली आहे.