शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शेती ठेका-बटईने देण्याकडे अनेकांचा कल

By admin | Updated: March 11, 2015 00:32 IST

मागील दोन, तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरूच आहे. अर्धाही उत्पादन खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. निव्वळ शेतीवर विसंबून राहणे अशक्यप्राय आहे.

लोकमत विशेषअमरावती : मागील दोन, तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरूच आहे. अर्धाही उत्पादन खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. निव्वळ शेतीवर विसंबून राहणे अशक्यप्राय आहे. पुढील हंगामात पेरणी कशी करावी ही समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी बैल-बारदाना मोडीत काढला आहे. यंदा पैशाच्या स्वरुपात किंवा भागिदारीत शेती देण्याकडे कल दिसून येत आहे.जिल्ह्यात पेरणीयोग्य १० लाख हेक्टर क्षेत्र आहे. संरक्षित सिंचनाची सोय असलेले १० टक्के क्षेत्र वगळता उर्वरित ९० टक्के क्षेत्र पावसावर अवलंबून असते. मागील वर्षी सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पावसामुळे खरीप हंगाम गारद झाला. सर्वाधिक पेरणी क्षेत्र असणारे सोयाबीन खराब झाले. परतीच्या पावसामुळे व जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात आलेल्या गारपिटीमुळे सर्वच पिके बाधित झालीत. परिणामी उत्पादन खर्चदेखील निघाला नाही.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत खरिपाची पेरणी सुरू होती. नंतर पावसात खंड यामुळे सोयाबीनची क्विंटलऐवजी किलोची झडती आली. काही शेतातील सोयाबीन शेतातच सडले. सोयाबीनच्या उत्पन्नात ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत घट झाली. उत्पादन खर्च निघणे दूरच, पेरणी खर्चदेखील निघू शकला नाही. सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. शेती पिकाची अवस्था काहीही असो घरगड्यांचा वार्षिक पगार हा लाखांच्या घरात पोहोचला आहे. मजुरीचे दर वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून भाड्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)सालकरी पोहोचला  एक लाखावरअक्षयतृतीयेनंतर सालकरी ठेवण्याची प्रथा आहे. जिल्ह्यात सालकऱ्याचे ७० ते ७५ हजार रूपये वर्ष असे करार असतात. याव्यतिरिक्त दिवाळी, पोळ्याला ड्रेस, धान्य हे वेगळेच आहे. हल्ली संपर्कासाठी मोबाईल देखील द्यावा लागतो. त्यामुळे हा सालकरी आता लाखावर पोहचला आहे. उत्पन्न कमी होत असल्याने अनेक मोठ्या खटल्यातून सालकरी बाद होऊन रोजंदारीवर कामे करीत आहेत. शेतीच्या प्रतवारीवर ठरतो भावशेती पैशाने, मक्त्याने किंवा भागिदारीत लावायची असल्यास त्या शेताची प्रतवारी पाहून भाव ठरतो. साधारणपणे जिल्ह्यात १० ते २५ हजार रूपये एकर असे भाव आहे. भागिदारीत दिली असल्यास प्रत्येक खर्च हा अर्धा विभागला जातो. एक हंगाम किंवा दोन्ही हंगामासाठी शेती दिली जाते. १८ हजारांनी घटली बैलांची संख्याजिल्ह्यात २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. यामध्ये २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेच्या तुलनेत बैलांची संख्या १८ हजारांनी कमी झाली आहे. यांत्रिककरण व नापिकीमुळे दोन वर्षांत ५ हजार बैलांची संख्या कमी झाली आहे.