शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

यवतमाळला सर्वेक्षणाचे आदेश, अमरावतीला ठेंगा

By admin | Updated: September 14, 2016 00:10 IST

३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

उफराटा न्याय : ५ लक्ष एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्तअमरावती : ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशीच स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तेथे पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सोयाबीनच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यातील सोयाबीनची तीच गत असताना जिल्हा प्रशासनाद्वारा कुठलीही हालचाल नसल्याने सोयाबीन उत्पादक कमालीचे संतप्त झाले आहेत. पेरणीनंतर सुरूवातीच्या काळात जिल्ह्यात समाधानकारक व पोषक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन बहरावर आले. नंतरच्या काळात सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. मात्र, ७ आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे पीक करपू लागले आहे. शेंगांमधील दाणा बारीक होऊन शेंगा पोचट होऊ लागल्या आहेत. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन करपू लागले आहे. दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीनची जी गत झाली तिच गत यंदाच्या खरीप हंगामात होत आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ८९ हजार २१२ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये जून महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तेथील व उच्चप्रतीच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती बरी आहे. सोयाबीनची स्थिती वाईटअमरावती : मात्र, हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती मात्र वाईट आहे. जिल्ह्यात यंदा अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २२ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५० हजार २७८ हेक्टर इतके सोयाबीन क्षेत्र आहे. मात्र, पावसाअभावी यंदा देखील सोयाबीन हातचे जाणार, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सलग तिसऱ्या वर्षी घात दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीन करपत आहे. शेंगा भरत नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्के घट आली. यंदा देखील ३५ दिवसांपासून पावसाचा खंड असल्यामुळे सोयाबीनची तिच गत झाली आहे. सोयाबीन करपले आहे. मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीतील सोयाबीन आताच उद्धवस्त झाले आहे. या दोन दिवसांत पाऊस न पडल्यास संरक्षित सिंचनाचे क्षेत्र वगळता सर्वत्र हीच स्थिती राहणार आहे. मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन पावसाअभावी करपले, ही वस्तुस्थिती आहे.मात्र, सर्वेक्षणाचे आदेश नाहीत. यासंदर्भात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. - दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी