शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळला सर्वेक्षणाचे आदेश, अमरावतीला ठेंगा

By admin | Updated: September 14, 2016 00:10 IST

३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

उफराटा न्याय : ५ लक्ष एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्तअमरावती : ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशीच स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तेथे पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सोयाबीनच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यातील सोयाबीनची तीच गत असताना जिल्हा प्रशासनाद्वारा कुठलीही हालचाल नसल्याने सोयाबीन उत्पादक कमालीचे संतप्त झाले आहेत. पेरणीनंतर सुरूवातीच्या काळात जिल्ह्यात समाधानकारक व पोषक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन बहरावर आले. नंतरच्या काळात सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. मात्र, ७ आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे पीक करपू लागले आहे. शेंगांमधील दाणा बारीक होऊन शेंगा पोचट होऊ लागल्या आहेत. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन करपू लागले आहे. दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीनची जी गत झाली तिच गत यंदाच्या खरीप हंगामात होत आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ८९ हजार २१२ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये जून महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तेथील व उच्चप्रतीच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती बरी आहे. सोयाबीनची स्थिती वाईटअमरावती : मात्र, हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती मात्र वाईट आहे. जिल्ह्यात यंदा अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २२ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५० हजार २७८ हेक्टर इतके सोयाबीन क्षेत्र आहे. मात्र, पावसाअभावी यंदा देखील सोयाबीन हातचे जाणार, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सलग तिसऱ्या वर्षी घात दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीन करपत आहे. शेंगा भरत नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्के घट आली. यंदा देखील ३५ दिवसांपासून पावसाचा खंड असल्यामुळे सोयाबीनची तिच गत झाली आहे. सोयाबीन करपले आहे. मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीतील सोयाबीन आताच उद्धवस्त झाले आहे. या दोन दिवसांत पाऊस न पडल्यास संरक्षित सिंचनाचे क्षेत्र वगळता सर्वत्र हीच स्थिती राहणार आहे. मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन पावसाअभावी करपले, ही वस्तुस्थिती आहे.मात्र, सर्वेक्षणाचे आदेश नाहीत. यासंदर्भात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. - दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी