शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

आ. यशोमती ठाकूर संतापल्या, म्हणाल्या मी गंगा भागीरथी नाही!

By प्रदीप भाकरे | Updated: April 14, 2023 14:45 IST

राज्यात सध्या विधवांना गंगा भागीरथी म्हणण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा-वाद सुरू

अमरावती : होय, मी गंगा भागीरथी नाही, मी कधीही माझ्या नावासमोर तसा उल्लेख करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी अगदी निक्षून सांगते, हा असला निर्णय या राज्यात आम्ही होऊ देणार नाही. मी माझ्या पतीला गमावलं. त्यांच्या अचानक निधनानंतर मी माझ्या दोन मुलांना सांभाळलं, मोठं केलं. मला या देशातील संविधानामुळे समानतेचा, शिक्षणाचा अधिकार मिळाला. मी आज एक स्वतंत्र माणूस म्हणून जगतेय. गुलामगिरीच्या जोखडातून समस्त दलित-शोषित-वंचित आणि महिला मुक्त झाल्या. मात्र, तरीही ही जोखडं पुन्हा या सर्व वर्गाच्या गळ्यात बांधायचा घातक डाव मनुवादी लोक सातत्याने करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी हा डाव उधळून लावू, असा गर्भित इशारा माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

राज्यात सध्या विधवांना गंगा भागीरथी म्हणण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा-वाद सुरू आहेत. जातिभेद-धर्मभेद मिटवण्यासाठी याच राज्यात आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्नांचा पुरस्कार केला गेला. स्वतः डॉ. आंबेडकरांनी याचा पुरस्कार केला. त्याच राज्यात राज्याचे महिला व बालविकासमंत्री कधी गंभा, कधी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांवर बंदीची भाषा बोलताहेत. या प्रतिगामी सरकारने राज्यातील छत्रपती शिवरायांच्या धोरणांतून फुललेला शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार संपवायचा विडा उचलला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विधवा महिलांना आधीच अनेक कुचंबणांचा सामना करावा लागतो. सामाजिक परिस्थितीशी झगडा देत असताना त्यांना नवनवीन विशेषणं लावून त्यांची स्थिती बदलणार नाही. त्यांच्यासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी काम केले पाहिजे. कोविड काळात या विषयाकडे आम्ही गांभीर्याने पाहिलं आणि विविध योजनांचा लाभ त्यांना एकछत्री कसा मिळेल यासाठी उपक्रम राबवले. राज्याची माजी महिला व बालविकास मंत्री म्हणून मला वाटतं सरकारकडून अशा संवेदनशीलतेची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरAmravatiअमरावतीPoliticsराजकारण