शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त स्कूल वाहनधारकांवर यशोमती ठाकूर संतापल्या

By admin | Updated: July 8, 2016 00:04 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे,

आरटीओला इशारा : अन्यथा आंदोलन करू!तिवसा : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. याबाबत त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरात व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या ने-आण करणाऱ्या स्कूल बसला हलगर्जीपणा व बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यापैकीच चार वर्षापूर्वी शहरातील नवसारी परिसरात झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून इतकी भीषण घटना घडल्यानंतरही याबाबत परिवहन विभाग हा विषय गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर थातूर-मातूर कार्यवाही करून सुरक्षित वाहतुकीसंदर्भात असलेल्या नियमांचे कठोर पालन होत नसल्याबाबतचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, शाळेतीेल मुलींची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबा निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती असते. परंतु ही समिती निर्माण करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात समिती कार्यान्वित झाली का याचा आढावा घेण्याची मागणी करुन ज्या बसमध्ये विद्यार्थिनी असतात. त्या बसध्ये स्त्री सहवर्ती ठेवणे कायद्याने बंधनकारक असताना हा कायदा राजरोसपणे मोडण्यात येत असल्याचे ही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सुरक्षित वाहतूक ही जबाबदारी आरटीओ, पोलीस विभाग व शिक्षण विभागाची असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अपेक्षित असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन व आॅटोमध्ये जनावरांप्रमाणे कोंबून नेले जात असल्याचे दिसूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नही. ही बाब निश्चितपणे संतापजनक असल्याचे सांगून हा अघोरी प्रकार आणखी किती दिवस घालून निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे का, असा रोखठोक सवाल उपस्थित करून याबाबत कठोर कार्यवाही व्हावी व नियम पायदळी तुडवणाऱ्या स्कूल बसमालक व चालकांवर नियमांचे पालन करण्याबाबत त्वरित निर्णय होण्यासोबतच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. (प्रतिनिधी)