शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

बेशिस्त स्कूल वाहनधारकांवर यशोमती ठाकूर संतापल्या

By admin | Updated: July 8, 2016 00:04 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे,

आरटीओला इशारा : अन्यथा आंदोलन करू!तिवसा : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. याबाबत त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरात व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या ने-आण करणाऱ्या स्कूल बसला हलगर्जीपणा व बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यापैकीच चार वर्षापूर्वी शहरातील नवसारी परिसरात झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून इतकी भीषण घटना घडल्यानंतरही याबाबत परिवहन विभाग हा विषय गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर थातूर-मातूर कार्यवाही करून सुरक्षित वाहतुकीसंदर्भात असलेल्या नियमांचे कठोर पालन होत नसल्याबाबतचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, शाळेतीेल मुलींची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबा निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती असते. परंतु ही समिती निर्माण करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात समिती कार्यान्वित झाली का याचा आढावा घेण्याची मागणी करुन ज्या बसमध्ये विद्यार्थिनी असतात. त्या बसध्ये स्त्री सहवर्ती ठेवणे कायद्याने बंधनकारक असताना हा कायदा राजरोसपणे मोडण्यात येत असल्याचे ही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सुरक्षित वाहतूक ही जबाबदारी आरटीओ, पोलीस विभाग व शिक्षण विभागाची असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अपेक्षित असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन व आॅटोमध्ये जनावरांप्रमाणे कोंबून नेले जात असल्याचे दिसूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नही. ही बाब निश्चितपणे संतापजनक असल्याचे सांगून हा अघोरी प्रकार आणखी किती दिवस घालून निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे का, असा रोखठोक सवाल उपस्थित करून याबाबत कठोर कार्यवाही व्हावी व नियम पायदळी तुडवणाऱ्या स्कूल बसमालक व चालकांवर नियमांचे पालन करण्याबाबत त्वरित निर्णय होण्यासोबतच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. (प्रतिनिधी)