शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बेशिस्त स्कूल वाहनधारकांवर यशोमती ठाकूर संतापल्या

By admin | Updated: July 8, 2016 00:04 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे,

आरटीओला इशारा : अन्यथा आंदोलन करू!तिवसा : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. याबाबत त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरात व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या ने-आण करणाऱ्या स्कूल बसला हलगर्जीपणा व बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यापैकीच चार वर्षापूर्वी शहरातील नवसारी परिसरात झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून इतकी भीषण घटना घडल्यानंतरही याबाबत परिवहन विभाग हा विषय गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर थातूर-मातूर कार्यवाही करून सुरक्षित वाहतुकीसंदर्भात असलेल्या नियमांचे कठोर पालन होत नसल्याबाबतचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, शाळेतीेल मुलींची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबा निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती असते. परंतु ही समिती निर्माण करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात समिती कार्यान्वित झाली का याचा आढावा घेण्याची मागणी करुन ज्या बसमध्ये विद्यार्थिनी असतात. त्या बसध्ये स्त्री सहवर्ती ठेवणे कायद्याने बंधनकारक असताना हा कायदा राजरोसपणे मोडण्यात येत असल्याचे ही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सुरक्षित वाहतूक ही जबाबदारी आरटीओ, पोलीस विभाग व शिक्षण विभागाची असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अपेक्षित असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन व आॅटोमध्ये जनावरांप्रमाणे कोंबून नेले जात असल्याचे दिसूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नही. ही बाब निश्चितपणे संतापजनक असल्याचे सांगून हा अघोरी प्रकार आणखी किती दिवस घालून निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे का, असा रोखठोक सवाल उपस्थित करून याबाबत कठोर कार्यवाही व्हावी व नियम पायदळी तुडवणाऱ्या स्कूल बसमालक व चालकांवर नियमांचे पालन करण्याबाबत त्वरित निर्णय होण्यासोबतच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. (प्रतिनिधी)