शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

सुधारणेला वाव !

By किरण अग्रवाल | Updated: July 22, 2018 01:31 IST

वैवाहिक संबंधातील विच्छेदनाच्या म्हणजे काडीमोडच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत, त्यामागे पती-पत्नीमधील बेबनावाचे कारण प्रामुख्याने आढळून येते. सदरचा विषय नव्याने चिंतेचा बनू पाहत असताना जुनी जळमटेही दूर होताना दिसत नाहीत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून सासरी होणारा छळ व त्यातून विवाहितेची आत्महत्या घडून येण्याचे प्रकारही कायम असल्याचे बघता समाजातले मागासलेपण दूर होऊ न शकल्याचेच म्हणता यावे.

ठळक मुद्देकुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत

कुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय आहे. भांड्याला भांडे लागणार म्हटल्यावर आवाज होणारच. परंतु काळानुरूप या आवाजाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी घरात वडीलधारी मंडळी असायची म्हणून पती-पत्नीतील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण कमी असायचे, हल्ली विभक्त कुटुंबावस्थेमुळे ते प्रमाण वाढले आहे. जरा जराशा कारणांमुळे परस्परात मतभिन्नता होऊन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, कारण शिकल्या-सवरल्यापणातून आलेला स्वाभिमान त्यांना पडती बाजू घेऊ देत नाही. कुठपर्यंत ताणायचे आणि कुठे सोडून द्यायचे हे सांगणारेच घरात नसतात. त्यातून वादाची परिसीमा गाठली जाते. पण याच शिक्षणातून सामंजस्य वा समजूतदारी का येत नाही हा प्रश्न आहे. अर्थात, मुद्दा तो नाही. शिक्षण वाढले आहे, विज्ञान प्रगत झाले आहे, तरी मूलबाळ होत नाही म्हणून छळल्या जाणाऱ्या व त्याकारणाने गळफास लावून घेणाºया विवाहिता पाहता, जीव गमावण्यामागचे हे कारण आज कालसुसंगत वाटते का, हा खरा मुद्दा आहे. बरे, ग्रामीण भागातील विचारांचा बुरसटलेपणा पूर्णत: कमी झालेला नसल्यामुळे असे होत असेल म्हणून गैरसमज करून घेता येऊ नये. शहरी भागातही असे प्रकार सुरूच आहेत. नाशिकच्या सिडकोतील पंडितनगर भागातील एका भगिनीने याच कारणास्तव लावून घेतलेला गळफास यासंदर्भात समाजमन अस्वस्थ करणारा आहे. आत्महत्यांच्या घटनांत अलीकडे अधिकतर कर्जबाजारीपणा वा परिस्थितीपुढे हात टेकावे लागल्याने आलेल्या मनाच्या खचलेपणाची कारणे दिसून येत असतात, त्याचसोबत मूलबाळ होत नसल्यातून होणाºया छळाचे पारंपरिक कारणही टिकून असल्याचे आढळून यावे, हे विशेष. कारण, वंध्यत्वाच्या समस्येवर विज्ञानाने मात केल्याची अनेक उदाहरणे आज समोर आहेत. स्वत:ला आई होता आले नाही तरी, आईपण अनुभवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत आहेत. असे असताना विचारांची चौकट न बदलता केवळ मूलबाळ होत नाही म्हणून सुनेचा छळ केला जात असेल व सात-सात वर्षे संसाराचा गाडा हाकून झालेल्या विवाहितेला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नसेल, तर या परिस्थितीला मागासलेपणाखेरीज दुसरे कोणते नाव ठेवता यावे? आपण नुसतेच शिकलो; पण सवरलो नाहीत. काळानुरूप लोकांची मानसिकता बदलली असे नक्कीच म्हणता येते, पण त्याज्य काय? म्हणजे टाकून काय द्यायचे हेच अनेकांना उमजले नाही असेच यावरून स्पष्ट व्हावे, तेव्हा, समाजसुधारणेला अजूनही मोठा वाव आहे, हाच यातील मथितार्थ!

टॅग्स :Familyपरिवार