शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बिझिलँडमधील आराधना शोरूमला पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST

नांदगाव पेठ : जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसायांवर निर्बंध आणले असताना बिझिलँड ...

नांदगाव पेठ : जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसायांवर निर्बंध आणले असताना बिझिलँड मार्केटमधील बहुतांश दुकाने आतून सुरू असल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. आराधना या कापड शोरूममध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास ग्राहक कापड खरेदी करीत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांचेसह महसूल विभागाचा ताफा तेथे पोहचला. कारवाईअंती आराधना शोरूमच्या संचालकांना पाच हजारांचा दंड ठोठावला.

केवळ कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी असताना बिझिलँडमध्ये काही दुकाने लपून छपून सुरू आहेत. पोलीस, महसूल, कृषी कर्मचारी याठिकाणी तैनात केले. मात्र, तरीही डोळ्यात धूळ फेकून येथील व्यावसायिक प्रशासनाला सहकार्य न करता व्यवसाय करीत आहेत. बाहेर गावाहून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत असून कोरोना काळात ही धोक्याची घंटा समजली जात आहे. शुक्रवारी सकाळी येथील आराधना शोरूममध्ये बाहेरगावाहून आलेले ग्राहक कपडे खरेदीसाठी गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य बलविर चव्हाण यांनी ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांना दिली. माहितीच्या आधारे जयश्री गजभिये, मंडळ अधिकारी विशाल धोटे, तलाठी अर्जुन अलोकार, तलाठी दुधे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल बोडखे, कोतवाल गजानन खंडारे तातडीने आराधना प्रतिष्ठानजवळ पोहचले दुकानातून ग्राहक निघताना दिसले. त्याचक्षणी गजभिये यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आराधनाचे संचालक मुकेश जगमलानी यांना पाच हजारांचा दंड ठोठावून प्रतिष्ठान बंद करण्यास सांगितले.

खंडणीची खोटी तक्रार

दुसरीकडे संतापलेल्या मुकेश जगमलानी व बिजिलँड व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय भुतडा यांनी ग्रामपंचायत सदस्य बलविर चव्हाण यांच्यावर रोष व्यक्त करीत त्यांना बिजिलँड परिसरात शिवीगाळ करून नांदगांव पेठ पोलिसांत पाच हजार रुपयांची खंडणी मागत असल्याची खोटी तक्रार दाखल केली. एकीकडे कोरोना महामारी सुरू असताना शासनाच्या नियमांचे पालन न करता प्रतिष्ठाने उघडी ठेवून व्यवसाय सुरू आहे व दुसरीकडे खंडणी मगितल्याचा खोटा आरोप करून व्यावसायिक शासनाची दिशाभूल करीत आहेत.

बॉक्स

बलवीर चव्हाणविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

आराधना प्रतिष्ठानचे संचालक मुकेश जगमलानी यांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य बलवीर चव्हाण यांच्यावर पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर करीत आहेत.