शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

२९ जुलै; जागतिक व्याघ्र दिन; जगात सर्वाधिक वाघ भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:19 IST

Amravati News जगातील एकूण वाघान पैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.

ठळक मुद्देमेळघाट व्याघ्र प्रकल्प पहिल्या नऊ पैकी एकइंदिराजींची दूरदृष्टी

अनिल कडू

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जगातील एकूण वाघान पैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.         सन २००६ मध्ये देशात १४११ वाघ होते. सन २०१० मध्ये १७०० वाघ होते. टायगर एस्टिमेशन रिपोर्टनुसार सन २०१४ मध्ये भारतात २२२६ वाघ होते. त्यात लक्षणीय वाढ झाली असून. सन २०१८ मध्ये ही वाघांची संख्या २९६७ झाली आहे. जागतिक स्तरावर ही नोंद सर्वाधिक ठरली आहे.  

          तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७३ मध्ये सर्वप्रथम देशात व्याघ्र अभयारण्य ही संकल्पना अस्तित्वात आणली. देशात पहिले नऊ व्याघ्र अभयारण्य घोषित केले. यात मेळघाट व्याघ्र अभयारण्याचा समावेश केला गेला. राज्यातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प.वाघांच्या संरक्षण, संवर्धनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे योगदान देशपातळीवर उल्लेखनीय असून देशातील टॉप टेन मधील एक व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाटची ओळख आहे. जागतिक व्याघ्र दिनी २९ जुलैला जागतिक स्तरावर देशासह या व्याघ्र प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केल्या जातो.

देशातील मोठा व्याघ्र प्रकल्प     वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाच्या अनुषंगाने देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर असून ३६१.२८ चौरस किलोमीटर चे गुगामल राष्ट्रीय उद्यान त्यात समाविष्ट आहे.

 शंभर वाघांची क्षमता         शंभरहून अधिक वाघांचा सांभाळ करण्याची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. वाघांचे छावे विचारात घेतल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ७२ वाघ आज वास्तव्यास आहेत.

 क्राईम सायबर सेल        मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वाइल्ड लाईफ क्राईम सायबर सेल सन २०१३ मध्ये स्थापन केल्या गेला. देशातील हा पहिला सायबर सेल. देशांतर्गत जवळपास अडीचशे शिकाऱ्यांना ,चोरट्यांना या सेलने पकडून दिले आहे. मागणीनुसार त्या त्या राज्याला हा सायबर सेल आपली सेवा देतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरट्या शिकाऱ्यांवर या सायबर सेलने आपला वचक निर्माण केला आहे.

टॅग्स :Tigerवाघ