शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

Vidhan Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदारसंघ वाटपावरून कार्यकर्ते अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:21 IST

अमरावती जिल्ह्यात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.

ठळक मुद्दे‘हेचि फळ काय मम तपाला?’ प्रचारादरम्यान उमेदवारांची कसोटी पक्षनेतृत्वावर मनधरणी करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युतीच्या जागावाटपात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता प्रचारादरम्यान उमेदवारांची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.बडनेरा मतदारसंघाचा आढावा घेता, आमदार रवि राणा अन् भाजपचे सन २०१४ मधील उमेदवार तुषार भारतीय यांच्यात मतदारसंघातील बहुतेक विकासकामांवरून झालेली तू-तू-मैै-मै महानगराने अनुभवली. यामध्ये कोणी तसूभरही हटले नाही. उमेदवारीचा जोरकस दावा करणारे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांंनीदेखील मतदारसंघाची बांधणी केली. मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला, असे ठामपणे सांगण्यात आले असतांना शिवसेनचा उमेदवार घोषित झाला.शिवसेनेतही सर्व काही ‘ऑलवेल’ नाही. जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी बडनेरा मतदारसंघासाठी प्रबळ दावा केला होता. मात्र, उमेदवारी प्रीती बंड यांना जाहीर झाली आहे. सद्यस्थितीत खराटे समर्थक अलिप्त दिसत आहेत. माजी आमदार संजय बंड यांनी या मतदारसंघात बांधणी केली होती. सन २०१४ मधील निवडणुकीत त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. संजय बंड यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पत्नी प्रीती बंड याच खºया दावेदार असल्याचे बंड समर्थकांनी दाखवून दिले.सन २०१४ मध्ये अचलपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. या मतदारसंघात माळी समाजाची गठ्ठा मते आहेत. मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असल्याने डावलण्यात आल्याची समाजभावना आहे. येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गजानन कोल्हे व सुधीर रसे यांनीदेखील प्रबळ दावा केला होता. यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.

तिवस्यात सेनेसह भाजपमध्ये खदखदमुख्यमंत्र्याद्वारे राज्यात काढण्यात आलेल्या महाजनाधार यात्रेची सुरुवातच मुळी तिवसा मतदारसंघातून करण्यात आली. यानिमित्त काँग्रेसच्या या गडात भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने मतदारसंघ भाजपचा, ही आशा मात्र जागावाटपात फोल ठरली. पराभवाची खंत न बाळगता भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी मतदारसंघाची बांधणी केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा शिवसेना स्थापनेपासून अविरतपणे कार्य करणारे व यावेळी प्रबळ दावा केलेल्या दिनेश वानखडे यांना डावलून जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने तिवस्यातील शिवसैनिक अस्वस्थ आहेत.

टॅग्स :amravati-acअमरावती