शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Vidhan Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदारसंघ वाटपावरून कार्यकर्ते अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:21 IST

अमरावती जिल्ह्यात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.

ठळक मुद्दे‘हेचि फळ काय मम तपाला?’ प्रचारादरम्यान उमेदवारांची कसोटी पक्षनेतृत्वावर मनधरणी करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युतीच्या जागावाटपात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता प्रचारादरम्यान उमेदवारांची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.बडनेरा मतदारसंघाचा आढावा घेता, आमदार रवि राणा अन् भाजपचे सन २०१४ मधील उमेदवार तुषार भारतीय यांच्यात मतदारसंघातील बहुतेक विकासकामांवरून झालेली तू-तू-मैै-मै महानगराने अनुभवली. यामध्ये कोणी तसूभरही हटले नाही. उमेदवारीचा जोरकस दावा करणारे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांंनीदेखील मतदारसंघाची बांधणी केली. मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला, असे ठामपणे सांगण्यात आले असतांना शिवसेनचा उमेदवार घोषित झाला.शिवसेनेतही सर्व काही ‘ऑलवेल’ नाही. जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी बडनेरा मतदारसंघासाठी प्रबळ दावा केला होता. मात्र, उमेदवारी प्रीती बंड यांना जाहीर झाली आहे. सद्यस्थितीत खराटे समर्थक अलिप्त दिसत आहेत. माजी आमदार संजय बंड यांनी या मतदारसंघात बांधणी केली होती. सन २०१४ मधील निवडणुकीत त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. संजय बंड यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पत्नी प्रीती बंड याच खºया दावेदार असल्याचे बंड समर्थकांनी दाखवून दिले.सन २०१४ मध्ये अचलपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. या मतदारसंघात माळी समाजाची गठ्ठा मते आहेत. मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असल्याने डावलण्यात आल्याची समाजभावना आहे. येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गजानन कोल्हे व सुधीर रसे यांनीदेखील प्रबळ दावा केला होता. यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.

तिवस्यात सेनेसह भाजपमध्ये खदखदमुख्यमंत्र्याद्वारे राज्यात काढण्यात आलेल्या महाजनाधार यात्रेची सुरुवातच मुळी तिवसा मतदारसंघातून करण्यात आली. यानिमित्त काँग्रेसच्या या गडात भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने मतदारसंघ भाजपचा, ही आशा मात्र जागावाटपात फोल ठरली. पराभवाची खंत न बाळगता भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी मतदारसंघाची बांधणी केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा शिवसेना स्थापनेपासून अविरतपणे कार्य करणारे व यावेळी प्रबळ दावा केलेल्या दिनेश वानखडे यांना डावलून जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने तिवस्यातील शिवसैनिक अस्वस्थ आहेत.

टॅग्स :amravati-acअमरावती