शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदारसंघ वाटपावरून कार्यकर्ते अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:21 IST

अमरावती जिल्ह्यात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.

ठळक मुद्दे‘हेचि फळ काय मम तपाला?’ प्रचारादरम्यान उमेदवारांची कसोटी पक्षनेतृत्वावर मनधरणी करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युतीच्या जागावाटपात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता प्रचारादरम्यान उमेदवारांची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.बडनेरा मतदारसंघाचा आढावा घेता, आमदार रवि राणा अन् भाजपचे सन २०१४ मधील उमेदवार तुषार भारतीय यांच्यात मतदारसंघातील बहुतेक विकासकामांवरून झालेली तू-तू-मैै-मै महानगराने अनुभवली. यामध्ये कोणी तसूभरही हटले नाही. उमेदवारीचा जोरकस दावा करणारे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांंनीदेखील मतदारसंघाची बांधणी केली. मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला, असे ठामपणे सांगण्यात आले असतांना शिवसेनचा उमेदवार घोषित झाला.शिवसेनेतही सर्व काही ‘ऑलवेल’ नाही. जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी बडनेरा मतदारसंघासाठी प्रबळ दावा केला होता. मात्र, उमेदवारी प्रीती बंड यांना जाहीर झाली आहे. सद्यस्थितीत खराटे समर्थक अलिप्त दिसत आहेत. माजी आमदार संजय बंड यांनी या मतदारसंघात बांधणी केली होती. सन २०१४ मधील निवडणुकीत त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. संजय बंड यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पत्नी प्रीती बंड याच खºया दावेदार असल्याचे बंड समर्थकांनी दाखवून दिले.सन २०१४ मध्ये अचलपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. या मतदारसंघात माळी समाजाची गठ्ठा मते आहेत. मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असल्याने डावलण्यात आल्याची समाजभावना आहे. येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गजानन कोल्हे व सुधीर रसे यांनीदेखील प्रबळ दावा केला होता. यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.

तिवस्यात सेनेसह भाजपमध्ये खदखदमुख्यमंत्र्याद्वारे राज्यात काढण्यात आलेल्या महाजनाधार यात्रेची सुरुवातच मुळी तिवसा मतदारसंघातून करण्यात आली. यानिमित्त काँग्रेसच्या या गडात भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने मतदारसंघ भाजपचा, ही आशा मात्र जागावाटपात फोल ठरली. पराभवाची खंत न बाळगता भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी मतदारसंघाची बांधणी केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा शिवसेना स्थापनेपासून अविरतपणे कार्य करणारे व यावेळी प्रबळ दावा केलेल्या दिनेश वानखडे यांना डावलून जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने तिवस्यातील शिवसैनिक अस्वस्थ आहेत.

टॅग्स :amravati-acअमरावती