शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अमरावती तहसील कार्यालवर महिलांचा मोर्चा

By admin | Updated: January 6, 2015 22:52 IST

स्थानिक तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील गोंधळाविरोधात मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वात महिलांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.

अमरावती : स्थानिक तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील गोंधळाविरोधात मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वात महिलांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यात.तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटुंब कल्याण आदी योजनांच्या अनेक लाभार्थ्यांची प्रकरणे तहसील कार्यालयात पडून आहेत. याबाबत शहरातील व तालुक्यातील अनेक लाभार्थी चौकशीसाठी तहसील कार्यालयात येतात. मात्र येथील तहसीलदार व्ही.डी. पाटील हे नागरिकांना असभ्य वर्तणूक देतात. त्यामुळे बाहेर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांच्या शंकेचे निराकरण या अधिकाऱ्यांकडून होऊ शकत नाही. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच वरील योजनांमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावी, अशी मागणी एसडीओ निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी संजय हिंगासपुरे, सुमती ढोक, अरुण चचाणे, लता अंबुलकर, शालिनी देवरे, कमल शिंगणजुडे, वंदना जामनेकर, प्रतिभा पाटील, ज्योती दुर्गे, निर्मला कचरे, रहिसा परवीन, शोभा किटके, अनुराधा लाहे आदींची उपस्थिती होती.